Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकशाहीला संपूर्ण क्रांतीकडे नेले पाहिजे:कुमार प्रशांत

Date:

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ८  डिसेंबर  २०२४ रोजी सकाळी साडेनऊ  ते सायंकाळी साडेपाच  या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.कोथरूड येथील गांधी भवनच्या  सभागृहात हे शिबीर झाले.गांधी पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच जयप्रकाश नारायण यांचे सहकारी कुमार प्रशांत  (जयप्रकाश नारायण व महात्मा गांधी  यांचे आंदोलन ),महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी  (गांधी आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक), साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ (युवकांसमोरील आव्हाने) या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ‘ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे १६ वे शिबीर होते.ज्ञानेश्वर मोळक यांनी स्वागत केले.अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले,सचिन पांडुळे यांनी सूत्रसंचालन केले.अजय भारदे, अरुणा तिवारी,तेजस भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.  
कुमार प्रशांत म्हणाले,’गांधीं बद्दल बोलणे म्हणजे वृद्ध माणसा बद्दल बोलणे, इतिहासाबद्दल बोलणे नव्हे. त्यांचे सर्व पुतळे वृद्धावस्थेतील आहेत.वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी दक्षीण आफ्रिकेत काय केले, तारुण्यात त्यांनी काय केले,हे आजच्या तरुण पिढीला कळले पाहिजे. वयाच्या २४ व्या वर्षी गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेत जगाला सत्याग्रह हे लढाईचे हत्यार दिले.युध्द आणि बंदुकांच्या काळात त्यांनी सत्याग्रह हे शस्त्र यशस्वी करून दाखवले.अशा गांधींजींचे पुतळे उभारलेले दिसत नाहीत. शेवटपर्यंत लढत राहणे हा गांधीजींचा संदेश आहे. संघर्षातून समाज परिवर्तन हा त्यांच संदेश आहे. भेदभाव संपवणे हे त्यांचे ध्येय आहे. समानता हे ध्येय आहे. त्यामुळे गांधीजींची लढाई संपत नाही. सगळेच देश स्वतंत्र झाले.पण, मानवी मूल्यांचा आग्रह फक्त भारतीय स्वातंत्र्य लढयात धरला गेला.गांधीजींना हे श्रेय जाते.हे गांधी आपण समजून घेतले पाहिजेत.त्यांना आपल्या मनात, जीवनात प्रवेश दिला पाहिजे.
मी स्वतः जयप्रकाश नारायण यांच्यासमवेत कारागृहात गेलो आहे.ते एक विद्यापीठ आहे.आजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन उभारले. त्यालाच सर्वोदय आंदोलन म्हटले गेले.जयप्रकाश नारायण यांनी लोकांमध्ये राहून लोकांना मजबूत करण्याचे काम केले. लोकतंत्र ला तंत्रलोक होऊ नये यासाठी त्यांनी योगदान दिले.लोकशाहीतून खऱ्या क्रांतीकडे गेले पाहिजे,हे गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनीच शक्य आहे.संपूर्ण क्रांती हे त्यांचे एकमेव उद्दीष्ट होते.लोकांना सक्रिय केले.लोक जागृत झाले पाहिजेत,असेही त्यांनी सांगितले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...