मुंबई-मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने मनसेबाबत महायुतीमधील निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेतील. याबाबत शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे फडणवीसांशी बोलतील, आणि त्यानंतर निर्णय होईल, असे वक्तव्य शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले आहे.दरम्यान गेली अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सरकार सकारात्मक आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला बरोबर घेऊ शकतात असे दिसते आहे.
उदय सामंत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती मविआ नेत्यांना राहील. ते देखील सहकार्य करतील. मविआ देखील परंपरा जपण्यास सहकार्य करतील. आम्ही दोघे भाऊ निवडून आलो याचा आनंद आहे. शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही काम करु आणि कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी प्रयत्न करु.
उदय सामंत म्हणाले की, महायुतीमध्ये कोणत्याही खात्यावरुन ओढाताण सुरु नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील. आम्ही गृह खाते मागितले, इतर खाती मागितली आहेत, त्याबाबत चर्चा अमित शहा यांच्यासोबत होईल, एकनाथ शिंदे चर्चा करतील. जे काही होईल ते समन्वयाने होईल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी होणार, याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीचे संकेत दिले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे, तेथे तेथे त्यांच्याशी युती करू.

