Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा अपमान, रामदास स्वामींना शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा अमित शाहांचा प्रयत्न: नाना पटोले

Date:

महायुतीच्या कलंकीत चेहऱ्यांना महाराष्ट्राच्या सत्तेतून दूर करा: अमित देशमुख

नाना पटोले यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी लातूरमध्ये प्रचारसभा संपन्न.

मुंबई,लातूर दि. ८ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भारतीय जनता पक्षाने पुन्हा अपमान केला आहे. दोन दिवसापूर्वी भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, रामदास स्वामींनी छत्रपतींच्या सोबत तरुणांना उभे केले असे सांगून शिवाजी महाराजांपेक्षा रामदास स्वामी मोठे होते असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राज्याच्या झंझावाती प्रचारावर असलेल्या नाना पटोले यांची लातूरच्या गंजगोलाई भागात जाहीर सभा झाली. या सभेला माजी मंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अॅड किरण जाधव, फारुख शेख यांच्यासह मविआचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अठरापगड जातीच्या मावळ्यांची फौज उभी केली, त्यात मुस्लीमांसह सर्व जाती धर्माचे लोक होते. भाजपा जाणीवपूर्वक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे काम करत आहे. सामान्य जनतेच्या मुळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे प्रकार केला जात आहेत. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण भाजपा युती सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रश्न सोडवला नाही. मविआची सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रश्नावर निर्णय घेतला जाईल. सोयाबीनचे एक केंद्र लातूर जिल्ह्यात उभे करु तसेच शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे स्मारकही उभे केले जाईल असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरु असून याचे नेतृत्व नाना पटोले करत आहेत. महायुतीच्या सरकारवर तोफ डागत देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यासाठी महायुती सरकारने एकही काम केले नाही. जायकडवाडी, माजलगाव, उजनीवरून पाणी देण्याचे केवळ आश्वासन दिले पण पाणी काही आले नाही. भाजपाने बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे घर फोडले, काँग्रेसचे घर फोडण्याचाही प्रयत्न केला पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. महायुती सरकारने महाराष्ट्राला लुटून खाल्ले, भ्रष्ट लोकांना मंत्रीपदे देण्यात आली. आता महायुतीच्या कलंकीत चेहऱ्यांना महाराष्ट्राच्या सत्तेतून दूर करण्याचे वेळ आहे त्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...