कोणताही वाद नाही,जिंकणार निर्विवाद :बापूसाहेब पठारे

Date:

वसुबारसच्या मुहूर्तावर बापूसाहेब पठारेंचा उमेदवारी अर्ज दाखल

​ पुणे:वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सोमवार,दि. २८ ऑक्टोबर रोजी रॅली काढत अर्ज दाखल केला.निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारावकर यांच्याकडे अर्ज दाखल केला.

यावेळी प्रकाश म्हस्के, भिमराव गलांडे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, राजेंद्र उमाप, किशोर विटकर, भयासाहेब जाधव, काँगेसचे माजी नगरसेवक सुनील मलके, संगीता देवकर, राजू ठोंबरे, रमेश सकट, विल्सन चंदेवळ, शिवसेनेचे सागर माळकर, आनंद गोयल, नितीन भुजबळ, शांताराम खलसे, राजेंद्र खांदवे, आशिष माने, शैलेश राजगुरू, आम आदमी पक्षाचे अमित म्हस्के, आरपीआयचे सचिन खरात यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्ष (सचिन खरात गट) व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्ष (सचिन खरात गट) व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.बापूसाहेब पठारे यांनी वसुबारसच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.

खराडी गाव ते येरवडा क्षेत्रीय कार्यालय या मार्गाने शक्तिप्रदर्शन करत महानिर्धार रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. २००९-२०१४ मध्ये ज्या पद्धतीने वडगावशेरी मतदारसंघात मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी करत एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यात यशस्वी ठरलो होतो, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातही शर्थीचे प्रयत्न करणार आहे. ​रोजगार,महिला सुरक्षा,शहर नियोजन,वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न यांसारख्या समस्यांवर प्राधान्याने तोडगा काढणार आहोत. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी काम करणार असल्याचेही माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

​​कोणताही वाद नाही,जिंकणार निर्विवाद :बापूसाहेब पठारे

यावेळी पत्रकारांशी बोलताना बापूसाहेब म्हणाले,’कार्यकर्ते आणि जनतेच्या जीवावर मी शंभर टक्के निवडणूक जिंकणार आहे.विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता विकास या मुद्द्यावर निवडणूक लढविणार आहे.​विरोधकांशी कोणताही वाद घालत बसणार नाही,पण ,जिंकणार हे निर्विवाद ​आहे.हा मतदार संघ चुकीच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न झाले.नियोजनशून्य विकास नको तर नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे.त्यामुळे माझा विजय पक्का आहे.दिवाळीपासूनच आमचे विजयाचे फटाके वाजणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इंडिगो 1,000 हून अधिक पायलटची भरती करणार

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो मोठ्या प्रमाणावर वैमानिकांची भरती...

रस्ते अपघात व सुरक्षेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : गोपाळकृष्ण पिल्लई

सरहदतर्फे डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे, जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान पुणे :  रस्त्यावरील अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असतानादेखील,देशभरात रस्त्यावर होणारे अपघात आणि रस्ते सुरक्षा या विषयांकडे गेल्या दोन दशकांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी केली. सरहद पुणेच्या वतीने डॉ.माधवगोडबोले स्मृती व्याख्यान आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे  टिळक स्मारक मंदिरयेथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘हरवलेले सुशासन’ या विषयावर पिल्लई बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर होते. या प्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त डॉ. योगेश म्हसे, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, डिजीपी कार्यालयातील प्रमुख लिपिक जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे होते. पिल्लई म्हणाले, रस्ते सुरक्षा हा इतका गंभीर विषय असतानादेखील गेल्या तीस वर्षांत एकाही खासदाराने त्यावर संसदेत चर्चा केलेली नाही. कारण त्यांच्यादृष्टीने रस्ते सुरक्षा हा मते मिळवून देणारा विषय नाही. त्यामुळे त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. वस्तुतः दररोज नव्याने सहा हजार वाहने रस्त्यावर उतरत असतील, तर केवळ मोठे उड्डाणपूल बांधून किंवा मेट्रो तयार करून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी व्यापक विचारमंथन होऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने हा विषय राजकीय दृष्टीक्षेपात कसा येईल, हे पुण्यातील सुजाण व विचारवंत लोकांनी पाहायला हवे. हा विषय अतिशय गंभीर असल्याने तो राज्यकर्त्यांच्या प्राधान्यक्रमावर यायला हवा. या विषयाचे स्वरूप इतके गंभीर झाले आहे की प्रशासन तरी कुठे-कुठे पुरे पडणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. २०४७ सालातील विकसित भारतहेलक्ष्य निर्धारित केले असून त्यासाठी अनेक चांगले प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. परंतु ते राबवताना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणे गरजेचे आहे. त्यातील मर्यादित पारदर्शकता दूर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिल्लई यांनी केले. इडीमध्ये काम करताना पूर्ण स्वातंत्र्य : विवेक वाडेकर आयकर आयुक्त विवेक वाडेकर म्हणाले, आजच्या स्थित्यंतराच्या काळात प्रशासनाची भूमिका फार महत्त्वाची आहे. इडी हा विषय आपल्याकडे खूप चर्चिला जात असला, तरी २०२३ सालापर्यंत या विभागामध्ये मी प्रत्यक्ष काम केले आहे. मी कार्यरत असेपर्यंत तरी एकदाही कुठल्याही राजकीय नेत्याने कधीही फोन करून दबाव आणला नाही किंवा काही करण्यास प्रवृत्त केले नाही. आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते; फक्त चांगल्या गुणात्मक कामाची अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रउभारणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच जबाबदारीने काम करायला हवे. आपल्यातील शासक हरवत आहे, ही आजची खरी अडचण आहे. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता : योगेश म्हसे.. सत्काराला उत्तर देताना योगेश म्हसे म्हणाले की, प्रशासनातील मूल्यांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने झाला आहे, असे मी मानतो. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा पुरस्कार अधिक लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्णय दृढ करेल, असा विश्वास मला वाटतो. जबाबदारी...

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात:उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक नाशिक, दि. 14...

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या...