Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आजच्या परिस्थितीत हिंदू समाजाला एकत्र आणणे महत्वाचे-स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

Date:

   विश्व हिंदू परिषद पुणे महानगराच्या वतीने  आयोजित ‘संत संगम ‘ कार्यक्रम
पुणे : हिंदू धर्म हा सर्व समभाव मानणारा आहे, कोणालाही कमी लेखणारा, भेदभाव करणारा नाही, मात्र आपणच किती वेळा दगा सहन करायचा? आजच्या परिस्थितीत हिंदू समाजाला एकत्र आणणे महत्वाचे आहे, आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे हे मान्य आहे, मात्र त्यासाठी आपण शिल्लक राहिजे पाहिजे. यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणूकीत मतदान करा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी  केले. 

विश्व हिंदू परिषद पुणे महानगराच्या वतीने स. प . महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल मध्ये आयोजित ‘संत संगम ‘ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज बोलत होते. यावेळी भंते हर्षवर्धन शाक्य, ज्ञानी अमरजीत सिंह, ह.भ.प.चिदंबरेश्वर साखरे महाराज, १००८ किन्नर आखाडा महामंडलेश्वर दीपाजी नंदगिरी जगावली माताजी, श्री महानुभव पंथाचे रविराज दादा पंजाबी, सिंधी संप्रदायाचे संत अनंत प्रकाशजी, वाल्मिकी संप्रदायाचे कैलासनाथ व भगवान महाराज,ह.भ.प फुरसुंगीकर व ह.भ.प पळसे महाराज या धर्मगुरूंसह विहिंप महाराष्ट्र व गोवा धार्मिक विभाग संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत धर्माचार्य सह प्रमुख नागनाथ  बोंगरगे, धर्माचार्य संपर्क प.म.प्रांत सदस्य समीर पायगुडे, पूर्व पुणे विभाग मंत्री धनंजय गायकवाड, पश्चिम पुणे विभाग मंत्री केतन घोडके आदी उपस्थित होते. 
पुढे बोलताना स्वामी  गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, आपला समाज, आपला देश टिकला पाहिजे, आपण देश प्रथम या भावनेने राष्ट्र वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या हिंदुस्थानाचा विस्तार प्रचंड मोठा होता, आपला देश अनेकदा संकुचित झाल्याचे दिसते भविष्यात संकुचित व्हायला जागा नाही, यामुळे आपण जगाला प्रेम देण्यासाठी आधी आपल्या सुरक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे. समाजवाद, सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या गोष्टी एका बाजूने होणार नाहीत, देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे. शिवरायांचा विचार देशात रुजणे महत्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हाच हिंदुत्वाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना किशोर चव्हाण म्हणाले, आपण हिंदुत्वासाठी मतदान कसे होईल यांची जागृती करण्यासाठी इथे जमलो आहोत. देशाला , समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी संविधान जीवंत असणे आवश्यक आहे. हिंदू बहुसंख्यक आहे तोपर्यंतच  देश आणि संविधान सुरक्षित असणार आहे यांची जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होण्यासाठी आपला हा उपक्रम आहे. 

संजय मुद्राळे म्हणाले, आपण आज संत संगम कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्माचार्यांचे विचार ऐकत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद असे अनेक संतांचे अनमोल योगदान आहे. सातव्या शतकापासून आपल्यावर असंख्य परकीय आक्रमणे झाली मात्र आपण आपला धर्म फक्त संताच्या धैर्यामुळे, मार्गदर्शनामुळे टिकवू शकलो आहोत, आजही त्यांच्या विचारांची आपल्या देशाला गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभम मुळूक यांनी केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...