देण्याची वृत्ती समाजाला समृद्धी व संपन्नतेकडे नेते- मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसळकर-जोशी

Date:

 कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे तर्फे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : केवळ धार्मिक कार्यापुरते मंदिर मर्यादित न ठेवता, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य संस्थांद्वारे केले जात आहे. आपण सामाजिक दायित्वाच्या मार्गावर चाललो, तर खूप काही करु शकतो. देण्याची वृत्ती ही समाजाला समृद्धी व संपनतेकडे घेऊन जाते. समाजाप्रती असलेली जबाबदारी प्रत्येकाने पूर्ण केली तर माणूस म्हणून जगताना आनंद मिळू शकतो. असेच कार्य कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट सारख्या संस्था करीत आहेत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसळकर-जोशी यांनी व्यक्त केले. 
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्षी देण्यात येणारा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ.माधवी वैद्य, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे उपस्थित होते. 
प. पू. श्री कलावती आईंचे अध्यात्मिक कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या बेळगाव येथील परमार्थ निकेतन संस्था, पत्रकार अर्चना मोरे पाटील व खेळाडू रेश्मा पुणेकर यांना प्रदान करण्यात आला. दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. परमार्थ निकेतन चा पुरस्कार संस्थेतर्फे प्रमुख विश्वस्त चैतन्यदादा मल्लापूरकर यांनी स्विकारला. 
परमार्थ निकेतन व अर्चना मोरे यांनी मिळालेली पुरस्काराची रक्कम पुन्हा ट्रस्टच्या सामाजिक कार्याकरिता दिली. पुरस्कारार्थींनी त्यांच्या खडतर वाटचालीत खंबीर पाठबळ देणारे रेश्माचे वडील शिवाजी पुणेकर व मार्गदर्शक संतोष तांबे तसेच अर्चनाच्या आई व लता मोरे यांचाही सन्मान ट्रस्टतर्फे करण्यात आला.

डॉ.माधवी वैद्य म्हणाल्या, स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. स्त्रिया आपल्या बौद्धिक सक्षमतेप्रमाणे सर्व क्षेत्रात लखलखत आहेत. आपले जीवन सफल करायचे असेल, तर आहार, विहार आणि विश्रांती ही तीन सूत्रे महत्वाची आहेत. आहारामध्ये शारिरीकतेसोबतच मानसिक आहार देखील गरजेचा आहे. आता स्त्रियांनी स्वत:ला अबला नाही, तर सबला समजायला हवे. 
पुरस्काराला उत्तर देताना चैतन्य दादा मल्लापूरकर म्हणाले, प.पू.कलावती आईंनी सन १९४२ साली हरिमंदिर येथून उपासनेला प्रारंभ केला. आज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे १२०० हून अधिक शाखा कार्यरत आहेत. आईंनी सर्वांना उपासनेचा मार्ग घालून दिला. त्यानुसार सर्वच जण सेवारुपाने येथे कार्य करतात, असे सांगत प.पू.कलावती आई आणि परामार्थ निकेतनचे कार्य सांगण्यात आले. 
रेश्मा पुणेकर म्हणाल्या, प्रत्येकाची परिस्थिती सामान्यच असते. मात्र, आई, वडिल, प्रशिक्षक आणि सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो. मी देखील या सर्वांच्या पाठिंब्यामुळे क्रीडा क्षेत्रात यश मिळवू शकले. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी सातत्य टिकविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. अर्चना मोरे म्हणाल्या, गुन्हे क्षेत्रात पत्रकारिता करताना अनेक प्रकारे दबाव येत असतो. पण आपण सत्य घटेनेचे वार्तांकन केले व सचोटीने काम केले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करायला मदत होईल. आपण केलेले काम हीच कालंतराने आयुष्यभराची ओळख होऊन जाते.
राजेंद्र बलकवडे यांनी स्वागत केले. डॉ.पराग काळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...