मुंबई-लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. ठाकरे सरकारने लोकायुक्त कायदा करणार असल्याचे सांगितले होते. पण, कायदा केला नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत अण्णांना आता ठाकरे दिसले का? असा सवाल उपस्थित केला आहे.दरम्यान भास्कर जाधव पुढे बोलताना म्हणाले की, अण्णा कधी जागे झाले? 2014 साली भाजपाचे सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारेंना विचारला आहे.
या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनी अण्णा हजारे यांच्यावर पलटवार केला आहे. अण्णा कधी जागे झाले? 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारे यांना विचारला आहे. आता लोकायुक्त कायदा विधानपरिषदेत मंजूर झाला आहे. हा क्रांतीकारण निर्णय आहे. फक्त नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे. वेळ पडली तर 88 व्या वर्षी हा कायदा समजवण्यासाठी महाराष्ट्रात फिरेन. भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण केला पाहिजे, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारने लोकायुक्त कायदा करणार असल्याचे सांगितले होते. पण, हा कायदा केला नाही. ठाकरे सरकारला हा कायदा नको होता. देवेंद्र फडणवीसांनी कायदा करण्यास वेळ घेतला. मात्र, कायदा केला, असेही अण्णा हजारे म्हणाले होते. त्यावर भास्कर जाधव यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. फडणवीस प्रत्येक समाजाला खोटे आश्वासन देत आहेत. धनगर समाज, लिंगायत समाज आणि मराठा समाज यांना किती वेळ म्हटलं आमची सत्ता येऊ द्या आम्ही तुम्हाला एका कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य अनेकदा केले. पण आजपर्यंत दिले का.? 2014 च्या निवडणुकीत आमचे सरकार आले तर विदर्भ वेगळा करू. त्याशिवाय मी लग्न करणार नाही असे म्हणाले होते. लग्न केलं का त्यांनी की ते बिचारे अजून अविवाहित आहेत. असा टोला भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

