Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

चांगुलपणाच्या बेरजेचे तत्त्वज्ञान समाजात रुजविण्याचा प्रयत्न : डॉ. श्रीपाल सबनीस

Date:

मातंग साहित्य परिषदेतर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृत महोत्सवी सत्कार
डॉ. अशोककुमार पगारिया यांचा डॉ. श्रीपाल सबनीस समाजकार्य तर डॉ. राजा दीक्षित यांचा डॉ. श्रीपाल सबनीस विचारवंत पुरस्काराने गौरव

पुणे : ‌‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय‌’ ही संकुचित भूमिका मान्य नाही तर ‌‘सकलजन हिताय, सकलजन सुखाय‌’ ही भूमिका मी मानतो. मला डावे-उजवेही मान्य नाही. मी चांगुलपणाच्या बेरजेचे तत्त्वज्ञान समाजात रुजवू पाहतो आहे, यासाठीच माझे जगणे व मरणे आहे. जातीच्या जाणिवांच्या पलिकडे जाऊन प्रेम करणे मला मान्य असून माझ्या तत्त्वात शुद्ध अंत:करणाची बेरीज आहे, असे प्रतिपादन विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. प्रत्येक जाती-धर्मात चांगले-वाईट अनुभवायला मिळत असताना मातंग साहित्य परिषदेकडे संवादाचे व्यासपीठ म्हणून बघतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सबनीस बोलत होते. डॉ. सबनीस यांचा सत्कार कोहिनूर ग्रुपचे संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती होती तर मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात डॉ. अशोककुमार पगारिया यांचा डॉ. श्रीपाल सबनीस समाजकार्य पुरस्काराने तर डॉ. राजा दीक्षित यांचा डॉ. श्रीपाल सबनीस विचारवंत पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, ललिता सबनीस मंचावर होते.

अभिजन आणि बहुजन यांना एकत्र करण्याची कृती मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून होत आहे, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, आज बहुजनामध्येही जातीवाद पोसला जात आहे. राजकारणी देखील स्वार्थासाठी असत्याची बेरीज करीत आहेत. परंतु मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून केली जाणारी बेरीज ही सत्यासाठी होत आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, डॉ. सबनीस हे कृतीशिल विचारवंत आहेत, त्यांची दृष्टी मानवतेची असून त्यांचे कार्यही महान आहे. प्रभुणे, डॉ. पगारिया, डॉ. दीक्षित यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
गिरीश प्रभुणे म्हणाले, डॉ. श्रीपाल सबनीस हे खरोखरच विवेकवादी विचारवंत असून महाराष्ट्रासह राजकारणात आज न आढळणारा विवेकवाद डॉ. सबनीस जपत आहेत. डॉ. भिसे यांची चळवळ समन्वय आणि विवेकवादी आहे. त्यांच्या भूमिकेला सबळ करण्यात डॉ. सबनीस यांचा मोलाचा वाटा आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य भाऊसाहेब जाधव म्हणाले, डॉ. सबनीस यांच्या वागण्या-बोलण्यात निस्वार्थीपणा आहे. त्यांचे कार्य महान आहे. ते सर्व समाजात वावरणारे आणि मानवतावाद जपणारे आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आपलेपणाची भावना आहे.
पुरस्काराबद्दल डॉ. राजा दीक्षित आणि डॉ. अशोककुमार पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. धनंजय भिसे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती विशद केली. आभार डॉ. संतोष रोडे यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बंगाल च्या निवडणुका म्हणून वंदेमातरम वर मोदींची चर्चा

सोमवारी लोकसभेत वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या...

काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले:जिन्नासमोर नेहरू झुकले..मोदींचा पुनरघोष

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्‌ला १५०...

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21...

मुंढवा प्रकरणातील आरोपी तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख…

पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित...