पुणे दि. २३ :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये एक ही जागा सोडली नाही. त्यामुळे अगोदरच नाराज असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हाच वाईट अनुभव विधान सभा निवडणूकीमध्ये देखील येताना दिसत आहे. भाजपा नेते महायुतीतील इतर घटक पक्षा सोबत गेली महिन्याभरापासून जागांच वाटाघाटी करत असताना रिपब्लिकन पक्षाला मात्र अक्षरशः ‘वाळीत टाकले’ सारखे केले आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते महायुतीकडे वारंवार भेटून किमान ५ ते ६ जागा तरी सोडा असा आग्रह करीत आहेत पण भाजपा व इतर मित्र पक्ष याबाबत ब्रशब्द काढायला तयार नाहीत.
रिपब्लिकन पक्षाने मुंबईतील चेंबुर धारावी, अहमदनगरमध्ये श्रीरामपुर, उत्तर नागपुर, यवतमाळ, मधील डमर खेड, नांदेड मधील देगल्लूर, पुण्यातील पिंपरी चिंचवड, कॅन्टोमेंट मतदार संघ इ. मतदार संघाची मागणी केली आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने पुणे लोकसभा मतदार संघात पूर्ण ताकती निशी काम केले आहे. त्यामुळे पुण्यातून किमान एक जागा वडगावशेरी, कॅन्टोमेंट या पैकी सोडावी अशी आमची आग्रही मागणी आहे. जागा वाटपाचा तीडा जोपर्यंत सुटत नाही तो पर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘महायुतीच्या’ प्रचारात सहभागी होवू नये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले हे पुढील आदेश देतील. असे सदर बैठकीमध्ये मांडण्यात आले. सदर बैठकीला शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, माजी उपमहापौर सुनिताताई वाडेकर, प्रदेश सदस्य अशोक कांबळे, अॅड. मंदारजो महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, पुणे शहर सरचिटणीस शाम सदाफुले, युवक अध्यक्ष विरेन साठे ,संदीप धांडोरे ,अविनाश कदम ,भारत भोसले ,जितेश दामोदरे .रोहित कांबळे उपस्थित होते.

