पूर्वी भाजप आणि सेनेतच जागावाटप असल्याने जास्त जागा वाट्याला यायच्या. मात्र आता अजितदादा गट आणि मित्रपक्षही सोबत असल्याने जागा कमी झाल्या आहे. 2019 मध्ये भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 105 उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 56 निवडून आले. राष्ट्रवादीने 121 लढवून त्यांचे 54 आणि काँग्रेसने 147 जागा लढवून 44 उमेदवार निवडून आले.

मुंबई-भाजपच्या उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली आहे. राज्यात भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या यादीवर भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वासह चर्चा होणार आहे. यासाठी फडणीस आणि भाजपचे इतर प्रमुख नेते मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत.असे सूत्रांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत. यानंतरच भाजपची पहिली यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. भाजप 160 जागा लढवणार आहे. उरलेल्या 128 पैकी शिंदे सेनेला 80 जागा तर राष्ट्रवादी दादा गटाला 48 जागा जवळपास निश्चित आहेत. यातून तिन्ही पक्षांना मित्रपक्षांना जागा सोडायच्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मात्र, कोणती जागा, काेणत्या पक्षाला सुटली हे जाहीर केले जाणार नाही. कारण ते माहिती झाले तर बाहेरून आलेले बंडखोरी करीत इतर पक्षात जाऊ शकतात. म्हणून आचारसंहिता जाहीर झाली तरी यादी जाहीर करण्याची घाई महायुती करणार नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपने 150 ते 160 जागा लढवल्यास 90 ते 95 जागा निवडून येऊ शकतात, असा प्राथमिक अहवाल असल्याचा दावा केला जातोय.

