मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सिद्दिकी यांचा मृत्यु झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गँगमधील एका सदस्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून ही जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री यांच्या बंगल्यावर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच मलबार हिल्स परिसरातील इतर मंत्र्यांच्या बंगल्याची देखील सुरक्षा वाढवण्यात आली असून बंगल्याबाहेर पोलिसांची गस्त वाढवली आहे. यासोबतच मलबार हिल्स परिसरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी आणि सलमान यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्ट्यांमध्ये सलमान नेहमी उपस्थित राहत असे. सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉनेन्स बिश्नोई गँगने घेतली असून त्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. या पोस्टमध्ये सलमान खानचा उल्लेख असल्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खानच्या बिग बॉस 18 चे शुटिंग देखील थांबवण्यात आले आहे.
हरियाणा आणि युपीच्या शूटर्सनी केली हत्या-दरम्यान, हरियाणा आणि यूपीच्या शूटर्सनी बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. पोलिसांनी 3 पैकी 2 शूटर्सना अटक केली आहे. एकजण फरार आहे. एक शूटर हरियाणाचा तर 2 उत्तर प्रदेशातील बहराइचचे आहेत. ते 40 दिवस मुंबईत थांबले होते आणि सिद्दिकी यांचे घर आणि मुलाचे कार्यालयाची रेकी केली होते. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कॉन्ट्रॅक्ट किलिंगला दुजोरा दिला आहे. शिव, धर्मराज आणि गुरमेल अशी या हत्येतील आरोपींची नावे आहेत. शिव आणि धर्मराज हे बहराइच, यूपीचे रहिवासी आहेत, दोघांवर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. गुरमेल हा हरियाणाचा रहिवासी आहे. धर्मराज आणि गुरमेल यांना अटक करण्यात आली आहे. शिव फरार आहे. त्याला या हत्येचे कंत्राट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.