सुरत-हिरे बाजारात ५० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी मंदी आली सुरतमध्ये ८ हजार छोटे-मोठे कारखाने हिऱ्यांना पैलू पाडतात आणि पॉलिश करतात. यापैकी बहुतेक कारखाने सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. सुमारे १५ लाख लोकांना रोजगार देणारा हिऱ्यांचा व्यवसाय मंदीचा सामना करत आहे.भारतातील एकूण हिऱ्यांपैकी ३० ते ४०% हिऱ्यांची अमेरिकेत निर्यात होते. सध्या मंदीमुळे अमेरिकन लॅबग्रोन हिरे विकत घेत आहेत. मात्र अमेरिकन बाजार सुधारल्यानंतर नैसर्गिक हिऱ्यांची मागणी पुन्हा वाढेल, असा हिरे व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.हिरे बाजारात काही कारणांमुळे मंदी आली आहे. युक्रेन-रशिया आणि हमास-इस्रायल यांच्यात पश्चिम आशियात पहिले युद्ध झाले. दुसरे म्हणजे अमेरिका आणि युरोपमधील मंदीचे सावट. मंदीमुळे तयार हिऱ्यांची मागणी कमी झाली त्यामुळे तयार हिऱ्यांच्या किमतीही गेल्या ३ वर्षांत सरासरी ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या आहेत, तर दुसरीकडे रफ हिऱ्यांच्या किमतीही २५% ने घसरल्या आहेत. त्यामुळे कट आणि पॉलिश करणाऱ्या कंपन्यांना १० % नुकसान होत आहे. नैसर्गिक हिऱ्यांना मागणी होती, पण त्या तुलनेत लॅबग्रोन स्वस्त होते. त्यामुळे लोक लॅबग्रोनकडे वळले. अशा प्रकारे लॅबग्रोनने नॅचरल डायमंडचा हिस्सा हिसकावला आहे.
गेल्या दोन वर्षांत हिऱ्याच्या किमती ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या आहेत. यामध्ये तयार हिऱ्यांची किंमत ३ वर्षांत ३५% कमी झाली आहे. म्हणजेच एकेकाळी १ लाख किमतीवाल्या हिऱ्याची किंमत घटून ६५-७० हजार झाली आहे. कच्च्या हिऱ्यांच्या किमती २५% पर्यंत घसरल्या आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांना १०% पर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोक आता गुंतवणुकीसाठी हिरे कमी घेत आहेत. गेल्या पन्नास वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे की, हिऱ्यांच्या व्यवसायात सलग दोन वर्षे मंदी आली. मंदीमुळे जी-७ देशांनी रशियन हिऱ्यांवर बंदी घातली होती तसेच चिनी लोकांनी हिऱ्यांऐवजी सोने दागिन्यांची खरेदी सुरू केली.
प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल युद्धाचा परिणाम हिऱ्यांच्या व्यवसायावरही झाला आहे. जगात पैलू पाडलेले आणि पॉलिश केलेल्या १० पैकी ९ हिरे सुरतमध्ये बनतात. सुरतमध्ये तयार झालेला असा हिरा सुरत आणि मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात होतो.
रशिया-युक्रेन युद्ध, हमास, लेबनॉनमधील युद्ध परिस्थितीमुळे अमेरिकेसह बाजारात मंदीचे सावट आहे. ज्याचा परिणाम सुरत आणि मुंबईसह देशातील हिरे उद्योगावर झाला आहे. २०२१-२२ मध्ये, जेव्हा कोरोनाच्या काळात सर्व उद्योग बंद होते तेव्हा हिरे उद्योगाने इतिहासात सर्वाधिक १.८० लाख कोटी रुपयांच्या हिऱ्यांची निर्यात केली.