Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र नासवला:देवेंद्र फडणवीस यांनी माणसांत माणूस आणि जातीत जात ठेवली नाही, सुषमा अंधारे यांचा घणाघात

Date:

दादर -शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नासवण्याचे काम केले असून, देवेंद्र फडणवीस यांनी माणसांत माणूस आणि जातीत जात ठेवली नाही, असे त्या म्हणाल्यात.

सुषमा अंधारे आपल्या भाषणात म्हणाल्या, आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक महत्त्वाचा मेळावा झाला. त्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजील द्वेष संपवण्याची भाषा केली. त्यांनी देश बलशाली करण्यावर भर दिला. दुर्बल घटकांना सोबत घेण्याची सूचना केली. पण त्यांना खरेच द्वेषबुद्धी संपवण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी तो सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा.

कारण, फडणवीस यांनी या राज्यात माणसांत माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. त्यांनी राज्यात द्वेषाचे राजकारण पसरवले. यासाठी त्यांनी कोकणातील बाजारातून रद्दबातल झालेली चिल्लर पाळली आहे. त्यांनी ही चाराणे – बाराण्याची चिल्लर बाजारात आणली. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचून त्यांना आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा असल्याचे ठणकावून सांगावे.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, कोकणातील ही चिल्लर अगोदर हिंदू – मुस्लिम करत होती. पण या दोन्ही समाजांनी कमालीचा संयम दाखवून त्यांच्या विद्वेषाला व लव्ह जिहादला कवडीची किंमत दिली नाही. मग भाजपने दुसरा खेळ सुरू केला. हिंदू-मुस्लिम कार्ड चालत नसल्यामुळे त्यांनी आता मराठा – ओबीसी कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे ते राज्यातील गावगाड्याची विण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने यावर विचार करावा.

कालपर्यंत आपण सर्वजण एकत्र राहत होतो. पण आज या लोकांनी आपल्यात द्वेष पसरवला. आज तेच शिंदे व फडणवीस आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. ते असे का करत आहेत? लोकांनी महागाई, बेरोजगारी आदी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांनी हे राजकारण सुरू केले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यांत खूपत असल्याचा आरोप करतात. पण ही योजना आमच्या डोळ्यांत खुपण्याचे काहीच कारण नाही. फडणवीसांनी या योजनेंतर्गत दिले जाणारे 1500 रुपये नागपूरचा बंगला विकून दिले नाहीत. ते पैसे जनतेचेच आहेत. शिंदे सरकारने ते फक्त महिलांना देण्याचे काम केले. सरकार याकामी केवळ पोस्टमनचे काम करत आहे. त्यामुळे त्यांनी या योजनेचे श्रेय घेण्याचे काम करू नये.

महायुती सरकारच्या नेत्यांना भाऊ – बहिणीच्या नात्यांची समज नाही. त्यांच्या बोलघेवड्या आमदारांनाही त्याची जाण नाही. भाऊ बहिणीला पैसे देतो तेव्हा त्याचे बॅनर लावत नाही. हे लोक आपली बहीण व तिच्या गरिबीची थट्टा करत आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस हे फेक नरेटिव्हचे महानिर्मिती केंद्र आहेत. काँग्रेसने आरक्षणाची मर्यादा वाढवली. तेव्हा 1960 साली भाजपचे अस्तित्वही नव्हते. त्यानंतर 1970 मध्ये पुन्हा एकदा राजकीय आरक्षणात वाढ करण्यात आली. त्यानंतरही फडणवीस भाजपने आरक्षण वाढवल्याचा दावा करतात. त्यामुळे ते फेक नरेटिव्हचे महानिर्मिती केंद्र असल्याचे स्पष्ट होते, असेही सुषमा अंधारे यावेळी फडणवीसांवर घणाघात करताना म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांना राज्यातील एकही आंदोलन सांभाळता आले नाही. त्यांनी राज्यात दंगली घडवून आणल्या. त्यांनी महाराष्ट्र नासवण्याचे काम केले. आज तेच आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. 10 वर्षांपूर्वी इंदू मिलचे भूमिपूजन केले. पण त्याची एकही वीट उभी केली नाही. शिवरायांचे स्मारकही अद्याप उभे राहिले नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...