पुणे -माझ्याकडे देशाचे अल्पसंख्याक मंत्रालय कामकाज आहे. काँग्रेस काळात या मंत्रालयास खूप बदनाम करण्यात आले. केवळ मुस्लिम मंत्रालय असे त्याला दाखवले गेले. पण आमचे मंत्रालय सहा धर्मियांसाठी काम करत आहे. मी ठिकठिकाणी जाऊन खरी परिस्थिती मांडून दुरुस्ती करत आहे. काँग्रेसने मुस्लिमांना व्होट बँक म्हणून पाहिले. त्यामुळे ते अल्पसंख्याक मंत्रालय हे मुस्लिम मंत्रालय असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रीजिजू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते.किरण रीजिजू म्हणाले, महाराष्ट्र मध्ये मी दौरा करत आहे कारण महाराष्ट्र वीरांची भूमी असून त्यातून देशाला प्रेरणा मिळते. राज्याला देशातील राजकारणात सध्या बदनाम करण्यात आले असून विरोधकांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दुषप्रचार करतात की, भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे. अल्पसंख्याक यांची गळचेपी होत आहे परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहे. देशविरोधी यांच्याशी संगनमत करून वेगवेगळे आरोप केले जातात. सर्व धर्मियांना सोबत घेऊन विकासाचे दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे. संविधान धोक्यात आहे असे सांगून खोटा प्रचार करणारे यांनी संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोष्टी हटवण्याचे काम आतापर्यंत करत आली आहे. संविधान नष्ट करण्याचे काम त्यांनी केले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान यात्रा, संविधान दिवस, संविधान पूजन सुरू केले. सबका साथ, सबका विकास यादृष्टीने आम्ही देशाचा विकास करत आहे. सन २०४७ मधील विकसित भारत यादृष्टीने काम करत आहे. महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन निर्माण करण्याचे आम्ही ठरवले असून ते सर्व धर्मियांसाठी असेल. बौद्ध विहार यांच्यासाठी विशेष मदत करण्यात येणार आहे कारण त्यांना सुरवातीला दुर्लक्षित करण्यात आले होते.
काँग्रेसने अल्पसंख्याक मंत्रालय बदनाम केले:केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रीजिजू यांचा आरोप
Date:

