पुणे लोकसभा मतदारसंघाची तातडीने पोटनिवडणूक घ्यावी असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले .आहे मात्र आता तरी निवडणूक आयोग न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार काय , न्यायालयाचे ऐकणार काय ?अशी साशंकता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना वाटते आहे ,ते म्हणाले ,'”पुणे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांचे निधन झाले तेव्हा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीस १५ महिन्यांचा अवधी शिल्लक होता. लोकप्रतिनिधींचे निधन झाल्यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणुकीस जर ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ शिल्लक असेल तर तातडीने त्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी ही बाब संविधानात समुद आहे. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याने राज्यात भाजपला पोषक वातावरण नाही ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आणि पोषक वातावरण नसल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.आशिया खंडातील सर्वांत जलदगतीने विकसित होणारे शहर म्हणून आपल्या पुण्याची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या स्वार्थासाठी पुण्याला त्यांच्या हक्काच्या प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवून मोठे पाप केले आहे. याची शिक्षा त्यांना निश्चितच येत्या निवडणुकीत मिळणार आहे.माननीय उच्च न्यायालयाने तातडीने पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले याचे आम्ही स्वागत करतो मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाची कार्यपद्धती बघता या आदेशाची अंमलबजावणी खरोखर होणार की हा मोठा प्रश्न आहे.” अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोग न्यायालयाचे ऐकणार काय ? प्रशांत जगतापांनी साशंकता ?
Date:

