Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहले आहे, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का?

Date:

छत्रपती संभाजी नगर – नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहले आहे, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने इतिहासात शिवाजी महाराजांनी सूरत लुटली असे चुकीचे शिकवले त्याबद्दल कॉंग्रेसला माफी मागायला लावणार काय ?मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असताना कमलनाथ यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरने हटवण्याचे पाप काँग्रेसने केले त्याची महाविकास आघाडी माफी मागणार का? असे प्रश्न करत येथे भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …. जाव पहले उस आदमी का साईन लेके आओ .. या ‘दिवार’ फिल्म डॉयलोग स्टाईलने माफी का मागितली नाही ? या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले.

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी रविवारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रभर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मविआच्या प्रमुख नेत्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पायी मोर्चा काढला. त्यावर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्नास वर्षे शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जगभरातील शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे, असा प्रति हल्ला चढवला.

गेटवे ऑफ इंडिया येथील शिवपुतळा स्थानी जोडे मारो आंदोलन करण्यासह राज्यभरात देखील मविआकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी “शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली आहे’ असा घणाघात केला. याच्या प्रत्युत्तरादाखल उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल माफी मागावी, असा हल्ला केला.

जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहले आहे, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असताना कमलनाथ यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरने हटवण्याचे पाप काँग्रेसने केले त्याची महाविकास आघाडी माफी मागणार का? त्यावर ठाकरे आणि शरद पवार का मूग गिळून बसले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला, यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत.

काँग्रेसने इतिहासात शिवाजी महाराजांनी सूरत लुटली असे शिकवले. महाराजांनी सूरत लुटली नव्हती स्वराज्याचा खजिना त्या लोकांवर आक्रमण करुन परत मिळवला होता. महाराज जणू काही सामान्य माणसाची लूट करायला गेले होते, असा चुकीचा इतिहास शिकवणाऱ्यांना उद्धव ठाकरे तुम्ही माफी मागायला सांगणार आहात की, खुर्चीसाठी मिंधेपण स्वीकारणार आहात? असा सवाल फडणवीस यांनी केला.

हे पूर्ण राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडीने लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतले असे इंदिरा गांधी यांचे एक तरी भाषण दाखवावे, असे आवाहन फडणवीस यांनी दिले. पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. त्यानंतरही राजकारण करणे हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान केला. त्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने अगोदर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...