Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली:14 ठार, पोखराहून काठमांडूला जाताना अपघात

Date:

महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक बालकही आहे. 31 जण जखमी आहेत. यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत पडले.

तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला. जिल्ह्याचे एसपी बीरेंद्र शाही म्हणाले – बस मर्स्यांगडी अंबुखैरेनीजवळ नदीत पडली आहे. स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. लष्कर आणि सशस्त्र दलांनाही सतर्क करण्यात आले आहे.

घटनास्थळी सशस्त्र पोलीस दलाच्या (एपीएफ) 45 कर्मचाऱ्यांचे पथक उपस्थित आहे. 23व्या बटालियनचे सुमारे 35 एपीएफ जवान बचावकार्य करत आहेत. नेपाळ लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर काठमांडूहून वैद्यकीय पथकाला घेऊन तनहुनकडे रवाना झाले आहे.

गोरखपूरचे डीएम कृष्णा करुणेश यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती. बसचा क्रमांक UP-53 FT 7623 आहे. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

सुमारे 4 महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या 3 बसेस महाराष्ट्रातून बुक केल्या होत्या. सुमारे 110 लोकांना घेऊन तीन बस 20 ऑगस्ट रोजी नेपाळला पोहोचल्या. या बसेस 29 ऑगस्टला परतणार होत्या.

आज एक बस नदीत पडली. या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झाला. दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुंगलिंगमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बहुतांश भाविक जळगावचे; देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केले आहे. यातील बहुतांश भाविक जळगावचे असून जळगावचे जिल्हाधिकारी यूपीतील महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत असे फडणवीस यांनी सांगितले आहे.उत्तर प्रदेश सरकारचे आपत्ती निवारण आयुक्त जी.एस. नवीन कुमार यांनी सांगितले की, ही एक ट्रॅव्हलर बस होती. त्यामुळे नेपाळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या बसमध्ये यूपी आणि इतर राज्यातील लोक असण्याची शक्यता आहे. महाराजगंजचे एसडीएम नेपाळला पाठवले जात आहेत.बस मालक विष्णू केसरवानी यांनी सांगितले की, आमच्या तीन बस गोरखपूरहून नेपाळला गेल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील लोक होते. आम्ही सगळ्यांना अलाहाबादहून आणलं होतं. येथून चित्रकूटला गेले. नंतर अयोध्येला आले. अयोध्येहून गोरखपूरमार्गे सुनौली आणि लुंबिनीला गेले. तेथून पोखराला गेले. तिन्ही बस पोखराहून काठमांडूला जात होत्या. मुगलिंगजवळ बसला अपघात झाला.

विष्णू केसरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे नाव मुस्तफा आहे. त्याचे भारतीय आणि नेपाळी दोन्ही नंबर बंद आहेत. त्याच्या जिवंत असण्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. भारतीय दूतावासातील लोक तेथे पोहोचले आहेत. बसमध्ये 40-42 लोक असतील. बसमध्ये नेपाळ आणि भारत दोन्हीसाठी विमा होता.नेपाळमधील तनहुन जिल्हा हा भूस्खलन प्रवण क्षेत्र आहे. त्याच्या एकूण 85 वॉर्डांपैकी 48 भूस्खलन जोखीम क्षेत्रात येतात. जून 2024 मध्ये मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी पावसाळ्यात ट्रॅफिक अलर्ट जारी केला होता.

गौतम यांनी पावसाळ्यात बाहेरून या भागात येणाऱ्या प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. हे क्षेत्र भूस्खलन, पूर, वीज पडणे आणि वादळ यांसारख्या उच्च जोखमीच्या क्षेत्रात मोडते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...

पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली..!

प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी रशिया सोबत संबंधाची पायाभरणी...

पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे ...