भारतीय जनता पक्षाचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला, महायुती सरकार सर्वात भ्रष्ट सरकार: रमेश चेन्नीथला.

Date:

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला: नाना पटोले.

केंद्रात आणि राज्यात लुटारूंचे सरकार, प्रत्येक कामात ४० टक्के कमिशनखोरी: विजय वडेट्टीवार

प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा राज्यस्तरीय विजय संकल्प मेळावा संपन्न.

मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२४

भारतीय जनता पक्षाचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला. काँग्रेस पक्ष एससी, एसटी, मागास समाजाला प्राधान्य दिले जात आहे, लोकसभेच्या निवडणुकीत या समाजाचे प्रतिनिधीत्व वाढले आहे आणि विधानसभा निवडणुकीतही असाच विजय संपादन करावयाचा आहे. एससी एसटी प्रवर्गाच्या ५४ जागा आहेत या जागांतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काम करावे लागेल. विधानसभेला एससी, एसटी प्रवर्गाच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा राज्यस्तरीय विजय संकल्प मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय एससी विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठीया, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अनिस अहमद, आमदार राजेश राठोड, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते. रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, विविध राज्यात आरक्षणाची मागणी जोर धरत आहे, जास्तीत जास्त समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागणार आहे तसेच ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्धार केला आहे. नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संसदेला नमन केले आणि संसद भवन बदलले यावेळी मोदींनी संविधानाला नमन केले आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवायला निघाले आहेत. देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला आहे. विकास काम होत नाही फक्त लुट सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटींचा आरोप केला, प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाही भाजपात प्रवेश देऊन पवित्र केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जनगणनेची भूमिका मांडली, बहुजनांची आर्थिक, सामाजिक शैक्षणिक सर्वे केला तरच न्याय मिळेल पण भाजपा व मोदी सरकारचा मात्र जनगणनेला विरोध आहे. युपीए सरकारने आणलेल्या महिला आरक्षणाला भाजपाने विरोध केला होता आणि तेच विधेयक भाजपाने मंजूर केले पण त्याची अमंलबजावणी केली नाही. महिला आरक्षणाची अंमलबजावणी न करून केंद्रातील भाजपा सरकारकडून लाडक्या बहिणींवर अन्याय केला आहे आणि राज्यात मात्र लाडकी बहिण असा दुजाभाव भाजपा करत आहे. विधानसभेला महायुती १०० जागाही जिंकू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला आहे असा घणाघाती हल्लाबोल करत महाराष्ट्रातून भाजपा युती सरकार गेले की दिल्लीतील सरकारही कोलमडेल आणि जनगणना करण्याचा मार्ग मोकळा होईल असेही नाना पटोले म्हणाले.

यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की आज शौर्याचा दिवस आहे आजच्या दिवशी इंग्रजांना चले जाओ भारत छोडो चा नारा दिला होता. करो या मरो या निर्धाराने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा दिला होता. भारतीय जनता पक्ष लोकसभेत बेईमानी करुन जिंकला. आता पुढची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. भाजपाच्या १०० पिढ्या संविधान संपवू शकत नाहीत. मोदींची ५६ इंचा ची छाती आता ३२ इंच झालीय. केंद्र आणि राज्यातले सरकार लुटारूंचे आहे. मतांची झाली कडकी म्हणून आठवली बहीण माझी लाडकी अशी महायुती सरकारची अवस्था आहे. या सरकारने महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. १० लाख कोटीच्या जागा विकल्या आहेत. प्रत्येक कामात ४० टक्के कमिशन खोरी सुरु आहे. फक्त नावाने आणि वारसाने आंबेडकर होता येत नाही तर कामातून आणि विचारातून आंबेडकर असले पाहिजे असा टोला प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

यावेळी राजेश लिलोठीया म्हणाले की,भाजपाने लोकसभा निवडणुकीला ४०० जागा जिंकून संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह पसरवला होता परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान रक्षणाचा संकल्प हाती घेतला व भाजपाचा हा डाव जनतेने हाणून पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रक्षणाचे काम काँग्रेस व इंडिया आघाडीने केले. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ९९ जागी विजय मिळला त्यात ३७ जागा एससी, एसटी समाजाच्या आहेत. विधानसभेला एससी विभागातील पदाधिकाऱ्यांचा विचार करावा, महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काम करा असे आवाहनही लिलोठीया म्हणाले.

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा ज्यांनी केली त्या भाजपाला धडा शिकवला व मोदी सरकारचे एनडीए सरकार झाले. सामाजिक न्याय विभाग काही काम करत आहे का असा प्रश्न पडतो. महायुती सरकार फक्त कंत्राटदारांचे खिशे भरत आहे व स्वतः मलई खात आहे. भाजपा सरकारने संविधानाची प्रस्तावना अभ्यासक्रमातून काढण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रासह चार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर केंद्रातील एनडीए सरकारलाही हादरा बसेल. लोकसभेत सक्षम विरोधी पक्ष असल्याने १० वर्षानंतर सरकारचे विधेयक संमत होऊ शकले नाही. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सरकारला संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले. आता विधानसभा निवडणुकीत विजय मिळवा आणि महाविकास आघाडीचे सरकार आणा,असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

यावेळी सिद्धार्थ हत्तीअंबीरे म्हणाले की, १० वर्षापासून भाजपा सरकारमुळे मागास समाज अनेक योजनांपासून वंचित आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील दलित, मागास समाज काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तसाच विधानसभेतही काँग्रेस पक्षाच्या मविआच्या पाठीशी उभे राहिल व भाजपा महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काम करेल. मागास समाजातील लोकांना निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी हत्तीअंबिरे यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...