पीसीयू चा रेड हॅटसोबत सामंजस्य करार

Date:

पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये रेड हॅट अकादमीचा प्रारंभ

पिंपरी, पुणे (दि. ०५ ऑगस्ट २०२४) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) पुणे, आणि आयटी क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रेड हॅट यांच्या मध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पिंपरी चिंचवड विद्यापीठात रेड हॅट अकादमी सुरु करण्यात येणार आहे. रेड हॅट ही लिनक्स प्रणालीवर चालणारी जगातली अग्रगण्य ओपन सोर्स सोल्युशन देणारी कंपनी आहे. या करारानुसार पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना रेड हॅटतर्फे आयटी कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर उपयोगी असणारे प्रमाणपत्र देण्यात येणार असून पीसीयु – रेड हॅट अकादमी असे नामकरण करण्यात आले आहे. शैक्षणिक प्रशिक्षण आणि इंडस्ट्रीतील अंतर कमी करण्यासाठी पीसीयु रेड हॅट अकादमी काम करेल. आयटी क्षेत्रातील अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य विकसित करून प्रत्यक्ष कार्यानुभव मिळेल. हा अभ्यासक्रम इंडस्ट्रीशी संलग्न असून अत्याधुनिक लॅब आणि प्रशिक्षक पुरवण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होईल आणि स्पर्धात्मक क्षेत्रात नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

पीसीयु – रेड हॅट अकादमीचा व्यापक अभ्यासक्रम –
पीसीयू रेड हॅट अकादमीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अभ्यासक्रम करण्याची संधी मिळेल. कोर सिस्टम एडमिनिस्ट्रेशन, क्लाऊड कॉम्प्युटींग, मिडलवेअर डेव्हलपमेन्ट. रेड हॅट सिस्टम एडमिनिस्ट्रेशन १ आणि २ द्वारे विद्यार्थ्यांना रेड हॅट एंटरप्राईजच्या लिनक्स प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्लाऊड कंम्प्युटींग अंतर्गत रेड हॅट ओपन स्टॅक एडमिनिस्ट्रेशन आणि ओपन शिफ्ट एप्लिकेशनच्या प्रशिक्षणाद्वारे क्लाऊड स्ट्रॅटेजीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मिडसवेअर डेव्हलपमेंटद्वारे पायथन प्रोग्रामिंग आणि जावा इइचा समावेश करण्यात आला आहे.
जागतिक स्तरावर मागणी असलेली ओपन-सोर्स कौशल्ये प्रदान करणे, जागतिक प्रमाणपत्रांद्वारे रोजगार योग्यता वाढवणे, लवचिक, प्रत्यक्ष शिक्षण अनुभव प्रदान करणे, उच्च-गुणवत्तेचे अभ्यासक्रम सामग्री देणे ही पीसीयू-रेड हॅट अकादमीची उद्दिष्ट आहेत. विद्यापीठातर्फे आयटीक्षेत्रात करीयर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांना पीसीयु रेड हॅट अकादमीशी संलग्न होण्याचे आवाहन प्रभारी कुलगुरु डॉ. मणीमाला पुरी यांनी केले.
विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीशी सुसंगत अभ्यासक्रम देण्यावर आमचा भर आहे. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर आम्ही लक्ष देत आहोत. रेड हॅटसोबत झालेल्या या सामंजस्य करामुळे पीसीयुच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचे प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असल्याचे, मत प्र-कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे यांनी व्यक्त केले. कंप्युटर विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एन. पाटील व डॉ. दिलीप सैनी यांनी आगामी उपक्रमाची तयारी व संक्षिप्त सादरीकरण केले. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी https://www.PCU.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी‌‌ असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करार करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...