संगीताच्या जादूगाराला गायकांचे ‘हटके’ अभिवादन 

Date:

हटके म्युझिक ग्रुप च्या वतीने संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या प्रसिद्ध रचनांचे सांगीतिक कार्यक्रमात सादरीकरण
पुणे : संगीतात नवनवे प्रयोग करणारे संगीतकार अशी ओळख असणारे पंचमदा. संगीताचे जादूगार आणि संगीत क्षेत्रामध्ये आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर अनेक प्रयोग करुन एक काळ गाजविणारे  पंचमदा अर्थात आर.डी. बर्मन यांना आपल्या गाण्यांच्या सादरीकरणातून गायकांनी अभिवादन केले. त्यांची अजरामर गीते सादर करुन कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

हटके म्युझिक ग्रुप च्या वतीने संगीतकार आर.डी. बर्मन यांना ८५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी “पंचम’दां  ना एक ‘हटके’ अभिवादन” या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये करण्यात आले होते.

कार्यक्रमात पंचम दां (राहुल देव बर्मन) यांच्या लोकप्रिय गाण्यांचे विख्यात वाद्यवृंदांसह सादरीकरण झाले. यात अवधूत जोशी, आनंद घैसास, आनंद गावडे, अशोक देशमुख, दिनेश कर्वे, डॉ.सुनील ताम्हणकर, गौरी तळेगावकर, प्रवीण शेळके, शिरीष कुलकर्णी, सुमेधा कुलकर्णी, स्वाती सोनसळे, राजश्री तेलकर, वैशाली कुलकर्णी यांनी गायन केले. हे सर्व हटके कलाकार आपापले व्यवसाय आणिक इतर व्यवधाने सांभाळून  संगीताची तपश्चर्या  करत आहेत

राजेश खन्ना आणि तनुजा यांच्यावर चित्रीत झालेले ‘ओ मेरे दिल के चैन’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘तुम्ही ओ रंगीले कैसा जादू किया’, ‘मुसाफिर हू यारो’, ‘एक मे और एक तू’ ‘ओ हंसिनी’, ‘आनेवाला पल जानेवाला है’ या आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांच्या सादरीकरणांनी श्रोत्यांना गतकाळाची सुरेल सफर घडविली. 

पंचमदा यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही श्रोत्यांच्या कानात रुंजी घालतात. कालानुरुप त्यांनी पाश्चात्य धाटणीचे संगीत आणले आणि ते भारतात लोकप्रिय देखील झाले. त्यांच्याबद्दलच्या विविध आठवणी सांगत हटके म्युझिक ग्रुप चे सर्वेसर्वा शिरीष कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीत निवेदन करताना कार्यक्रमात रंगत आणली.  

आप की कसम चित्रपटातील ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है’, मजरूह सुलतानपुरी लिखित आणि आर.डी.बर्मन यांचे संगीत असलेले ‘बचना ए हसीनो’ या गीताच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांनी दाद दिली. ‘तेरे बिना जिया जाये ना’, ‘वादिया तेरा दामन’, ‘पूछो ना यार क्या हुआ’, ‘मेरे नैना सावन भादो’  या गीतांनी रसिकांची मने जिंकली. हटके ग्रुप चे सर्वच कलाकार वाद्यवृंदा मध्ये एकदम झोकून गेले होते आणि त्यांच्या तयारीचे, सांगीतिक प्रगतीचे आणि कौशल्याचे श्रोतृगणाने  भरभरून कौतुक केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...