इंडिया आघाडीच्या नेत्यांवर परदेशातून हल्ल्याचा कट, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Date:

सरकारची झोप राहुल गांधींनी उडवली
संजय राऊत म्हणाले, ”काहीही होऊ शकते. उद्या राहुल गांधींवर हल्लाही होऊ शकतो, आमच्यावर हल्ला होऊ शकतो. मोदी आणि अमित शहा यांना राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीने सळो की पळो करून सोडले आहे. या सरकारची झोप राहुल गांधींनी उडवली आहे. मात्र तरीही गुंडांची मदत घेऊन आमच्यावर हल्ला होऊ शकतो”, असा आरोप राऊतांनी केला आहे.

मुंबई- राहुल गांधींनी लोकसभेत सरकारला आरसा दाखवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो असे खळबळजनक विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, इंडिया आघाडीच्या नेत्यांवर हल्ल्याचा कट रचला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विट करत एक मोठा दावा केला आहे. ईडीच्या एका आतल्या गटाने मला सांगितलं की तुमच्यावर (राहुल गांधी) छापेमारी होऊ शकते असे राहुल गांधी म्हणाले. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊतांनी यावर भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ”राहुल गांधी हे लोकशाहीचा आवाज लोकसभेत बुलंद करत आहेत. राहुल गांधींनी सरकारला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. राहुल गांधींना पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल, आम्ही तयार आहोत. भाजपाने बहुमत गमावलं आहे तरीही घटनाबाह्य कामं करण्याचे व्यसन काही त्यांचे सुटत नाही असे दिसत आहे. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या आम्हा सगळ्यांच्या विरोधात एक कट रचला जातो आहे. हा कट इथे नाही तर परदेशात शिजतो आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...