अर्थखात्याचा माझी लाडकी बहीण योजनेवर आक्षेप:राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज असताना योजना कशी राबवणार? उपस्थित केला सवाल

Date:


मुंबई- राज्य सरकारमधील अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीच राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतला आहे. अर्थ मंत्रालय सध्या अजित पवार यांच्याकडे आहे. त्यांनीच अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली होती. असे असताना त्यांच्या अर्थ मंत्रालयातीलच अधिकारीच या योजनेवर आक्षेप घेत असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.राज्यावर तब्बल 8 लाख कोटींचे कर्ज असताना योजना राबवायची कशी? असा प्रश्न अर्थ मंत्रालयाकडून राज्य सरकारला विचारण्यात आला आहे. स्वतः अजित पवार या खात्याचे मंत्री असून त्यांनीच या योजनेची घोषणा केली आहे. मात्र, असे असताना अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या या योजनेवर आक्षेप घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. असे असतानाही दरवर्षी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारी तिजोरीमधून 46 हजार कोटी रुपये कसे द्यायचे? असा प्रश्न अर्थ खात्यासमोर आ वासून उभा आहे. मंत्रिमंडळाने लाडकी बहीण योजना आणि त्यासंदर्भातील आर्थिक तरतूदींसाठी मंजुरी दिली असली तरी हा निधी नेमका द्यायचा कसा याची चिंता अर्थ खात्याला लागली आहे. यासंदर्भातील माहिती अर्थ खात्यातील सूत्रांनीच दिल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

प्रस्तुत योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते. या योजनेतून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतील. वय वर्षे 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रात देखील मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. यातील पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दरम्यान देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या योजनेची घोषणा झाल्यानंतर आता राज्यभरात महिलांनी योजनेचे अर्ज भरण्यासाठी गर्दी केली आहे. ठिकठिकाणी त्यासाठी पदाधिकारी व्यवस्था देखील करीत आहेत. त्यामुळे योजनेला महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

गोरगरीब महिलांच्या खात्यात पैसे जाण्याची वेळ आल्यावरच तुम्हाला तिजोरी आठवते का?

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिला या अमेझॉन वर शॉपिंग करणाऱ्या नाहीत. त्या आसपासच्या दुकानातून आणि मंडितून खरेदी करतात. त्यांच्या हातात पैसा आल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महिलांवर अन्याय करण्याची इच्छा असणाऱ्यांनाच राज्याची चिंता सतावत असल्याचे टिका देखील त्यांनी केली. गोरगरीब महिलांच्या खात्यात पैसे जाण्याची वेळ आल्यानेच तुम्हाला तिजोरी आठवते का? असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...