भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘राम पर्व’ हा कार्यक्रम शनिवार,१३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.’व्यक्ताव्यक्त’ ,पुणे प्रस्तुत या कार्यक्रमात रामायणातील प्रसंगांवर नव्याने शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलेली गीते सादर केली जाणार आहेत.
रामायणातले काही प्रसंग आणि ज्यांच्यावर काव्य लेखन झालेले नाही असे प्रसंग आणि पात्रं शोधून त्यावर काव्य लिहिण्याचा हा प्रयत्न ‘पार्थ’ (अमित गोखले) या कवीने केलेला आहे.या रचनांना गीतरामायणाच्या पद्धतीनेच संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न हेमंत आठवले आणि सौ. जान्हवी गोखले यांनी केला आहे. शुभदा आठवले,केदार तळणीकर,अवधूत धायगुडे,वेधा पोळ साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.रसिकांना तो विनामूल्य खुला आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१७ वा कार्यक्रम आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.