दिलेले दान सत्कारणी लागल्याचे समाधान-डॉ. प्रमोद चौधरी

Date:

मधुभाऊ चौधरी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन
अहिल्यानगर : “माझे वडील मधुभाऊ चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काहीतरी भरीव सामाजिक योगदान देण्याचा विचार मनात होता. त्यावेळी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या लोकांची भेट झाली आणि मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्ताव आला. चौधरी कुटुंबीय मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेत आले आहे. समितीच्या सहाय्याने साठ मुलींच्या वसतिगृहाची उभारणी झाली आणि त्याचे आज उद्घाटन होत आहे. ही आनंदाची गोष्ट असून, दिलेले दान सत्कारणी लागल्याचे समाधान वाटतेय,” अशी भावना ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केली.

परिमल आणि प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या सहयोगातून अहिल्यानगर (अहमदनगर) येथे विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कै. म. कृ. उर्फ मधुभाऊ चौधरी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन परिमल आणि प्रमोद चौधरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी स्नेहालयचे संस्थापक अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, डॉ. ज्योती गोगटे, रत्नाकर मते, संजय अमृते, कार्यकर्त्या सुप्रिया केळवकर आदी उपस्थित होते.

डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “समितीचे कार्य युवकांच्या पिढीला आकार देणारे आहे. त्यांनी दिलेला प्रस्ताव भावला. वर्षभरातच तो उभारावा, या विचाराने सर्वतोपरी सहकार्य केले. आज त्याला मूर्त रूप आल्याचे समाधान आहे. समितीच्या कार्याचा विस्तार समाजाला हितकारक आहे. परदेशातही समिती पोहोचली आहे. चांगल्या संस्थेच्या चांगल्या उपक्रमाला पैसे दिल्याचा आनंद आहे.”

गिरीश कुलकर्णी म्हणाले, “नगरसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. अनेक चांगल्या संस्थांची पायाभरणी दादा चौधरी यांनी केली आहे. त्यांच्या विचारांचा, त्यागाचा व दातृत्वाचा वारसा चौधरी कुटुंबाने जपला आहे. समितीच्या माध्यमातून चांगला उपक्रम नगरला झाला असून, परिसरातील मुलींना त्याचा लाभ होईल. समाजाला एकसंध ठेवण्याचा संस्कार समिती रुजवत आहे.”

प्रतापराव पवार म्हणाले, “उत्तम विद्यार्थी व नागरिक घडविण्याचे काम समितीमार्फत नगरमध्येही होत राहील. नगरवासी आणि समितीचा मोठा ऋणानुबंध आहे. आता ही वास्तू तुमचीच झाली आहे. त्यामुळे या कामात आपण भविष्यात हातभार लावावा. मुलींचे शिक्षण, उत्कर्ष आणि सामाजिक जडणघडण यावर समितीने कायमच भर दिला आहे.”

शामराव निसळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चौधरी आणि निसळ यांचा तीन पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या दोन्ही कुटुंबाने सामाजिक योगदान दिले आहे.  मधुभाऊंच्या शताब्दीनिमित्त हा प्रकल्प साकार झाल्याचा आनंद वाटतो, असे त्यांनी नमूद केले.

तुकाराम गायकवाड यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. रविंद्र देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. तुषार रंजनकर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...