मोदी काळाच्या (२०१४ व १९च्या)तुलनेतच्, २०२४ चा कौल देतांना जनतेने भाजपच्या २२% जागा घटवल्या व काँग्रेस च्या ९८% जागा वाढवल्या .तरीही मोदी काँग्रेसच्या ऐतिहासीक (?) परभवाचे तुणतुणे वाजवतात.पंतप्रधान पदी बसलेल्या नेत्याने, लोकमताचा आब राखून, खुल्या मनाने आत्म चिंतन केले पाहीजे.- काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
पुणे – “काँग्रेस अघ्यक्ष व राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते खर्गे यांना संसदेत बोलू न दिल्याचा तीव्र निषेध करत असून,“संसदेच्या सभापतींकडून पक्षपाती वागणूक व संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परीषदेत केला.
“मोदींची काँग्रेस, संविधान व डॉ आंबेडकरांविषयीची विधाने असत्य, चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे सांगून ते म्हणाले,’
भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांस, राज्यसभेत मोदींच्या असत्य, तथ्यहीन व खोटे आरोपांवर ऊचीत खुलासा मांडणे बाबत, संविघानिक अधीकारांतर्गत बोलू न दिल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तीव्र निषेध करत आहे तसेच जनतेत जाऊन देखील भाजपच्या मनमानी व दडपशाही कारभाराचा निषेध नोंदवणार असल्याचे सांगितले.
राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने पत्रकार भवन येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस जेष्ठ काँग्रेसजन सर्वश्री सुभाष थोरवे, रामचंद्र शेडगे, महेश अंबिके, धनंजय भिलारे, संजय अभंग, गणेश मोरे, ऊदय लेले, गणेश शिंदे, राजेश सुतार इ उपस्थित होते.
गोपाळ तिवारी यांनी सांगितले, “मोदी काळाच्या अनुभवा नंतरच, २०१९ च्या तुलनेत जनतेने भाजपच्या २२% टक्के जागा घटवल्या तर काँग्रेसच्या ९८% जागा वाढवल्या तसेच एनडीए आधाडी पेक्षा ही इंडीया आघाडीस ३.५६ % मतांचे प्रमाण जास्त आहे या वास्तवतेचे भान देखील मोदींनी ठेवले पाहीजे.
राहुल गांधी यांचा लोकसभेत सामना करण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री व ७ ते ८ मंत्री विना सभापती मान्यते विना खुलासा करण्यासाठी ऊभे रहातात मात्र राज्य सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्रीकार्जून खर्गे यांना मात्र मोदींच्या खोट्या आरोपांवर हात वर करून सुध्दा संधी दिली जात नाही हे निंदनीय आहे.
वास्तवतेला नाकारत, काँग्रेस पक्ष पराभवाचा उच्चांक गाठत असल्याचे खोटे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, अशी विधाने करून ते जनतेला भ्रमित करीत असल्याचे प्रतिपादन गोपाळ तिवारी यांनी केले.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचा राजीव गांधी स्मारक समिती प्रयत्न करणार, लवकरच पुण्यात वाहतूक परिषदेचे आयोजन-
शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी मात्र वर्षानुवर्षे तितकीच असताना, “संभाव्य रस्तारुंदी” गृहीत धरून वाढीव चटई क्षेत्रे मंजुर करून, बांधकामे मात्र प्रचंड वेगाने होत आहेत.असे सांगून गोपाळ तिवारी म्हणाले,’प्रस्तावित रस्ते रुंदी पेक्षा वास्तवतेतील रस्ते रुंदींवर चटई क्षेत्र मंजुर करण्याची खरे तर काळाची गरज आहे.सोसायट्यांचा पुनर्विकास होताना वाढीव एफएसआय घेऊन मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.
त्यातील २०% वाहने जरी रस्त्यावर आली तरी वाहतुक कोंडी होते.. त्यामुळे पुणे शहर सध्या वाहतूक कोंडीच्या तीव्र समस्येला सामोरे जात आहे, येणाऱ्या काळात हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुरेशा रुंद – रस्त्यांच्या नियोजना अभावी मेट्रोचा ४ % वाढीव एफएसआय देणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न पुढे येता त्यामुळे यावर तज्ञांची साधक बाधक चर्चा घडवून आणण्या साठी “वहातुक परिषदेचे” आयोजन, ‘राजीव गांधी स्मारक समिती’च्यावतीने येत्या ८ दिवसात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर केले जाणार असल्याची माहिती गोपाळ तिवारी यांनी दिली. या परिषदेत माजी सनदी अधिकारी, नियोजनकार, वास्तु विषारद, लोक प्रतिनिधी इ उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

