Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काँग्रेसच्या नांवे बोटे मोडण्यास मोदी भ्रमित झाले काय ..?

Date:

मोदी काळाच्या (२०१४ व १९च्या)तुलनेतच्, २०२४ चा कौल देतांना जनतेने भाजपच्या २२% जागा घटवल्या व काँग्रेस च्या ९८% जागा वाढवल्या .तरीही मोदी काँग्रेसच्या ऐतिहासीक (?) परभवाचे तुणतुणे वाजवतात.पंतप्रधान पदी बसलेल्या नेत्याने, लोकमताचा आब राखून, खुल्या मनाने आत्म चिंतन केले पाहीजे.- काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

पुणे – “काँग्रेस अघ्यक्ष व राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते खर्गे यांना संसदेत बोलू न दिल्याचा तीव्र निषेध करत असून,“संसदेच्या सभापतींकडून पक्षपाती वागणूक व संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परीषदेत केला.
“मोदींची काँग्रेस, संविधान व डॉ आंबेडकरांविषयीची विधाने असत्य, चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे सांगून ते म्हणाले,’
भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांस, राज्यसभेत मोदींच्या असत्य, तथ्यहीन व खोटे आरोपांवर ऊचीत खुलासा मांडणे बाबत, संविघानिक अधीकारांतर्गत बोलू न दिल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तीव्र निषेध करत आहे तसेच जनतेत जाऊन देखील भाजपच्या मनमानी व दडपशाही कारभाराचा निषेध नोंदवणार असल्याचे सांगितले.
राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने पत्रकार भवन येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस जेष्ठ काँग्रेसजन सर्वश्री सुभाष थोरवे, रामचंद्र शेडगे, महेश अंबिके, धनंजय भिलारे, संजय अभंग, गणेश मोरे, ऊदय लेले, गणेश शिंदे, राजेश सुतार इ उपस्थित होते.
गोपाळ तिवारी यांनी सांगितले, “मोदी काळाच्या अनुभवा नंतरच, २०१९ च्या तुलनेत जनतेने भाजपच्या २२% टक्के जागा घटवल्या तर काँग्रेसच्या ९८% जागा वाढवल्या तसेच एनडीए आधाडी पेक्षा ही इंडीया आघाडीस ३.५६ % मतांचे प्रमाण जास्त आहे या वास्तवतेचे भान देखील मोदींनी ठेवले पाहीजे.
राहुल गांधी यांचा लोकसभेत सामना करण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री व ७ ते ८ मंत्री विना सभापती मान्यते विना खुलासा करण्यासाठी ऊभे रहातात मात्र राज्य सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्रीकार्जून खर्गे यांना मात्र मोदींच्या खोट्या आरोपांवर हात वर करून सुध्दा संधी दिली जात नाही हे निंदनीय आहे.
वास्तवतेला नाकारत, काँग्रेस पक्ष पराभवाचा उच्चांक गाठत असल्याचे खोटे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, अशी विधाने करून ते जनतेला भ्रमित करीत असल्याचे प्रतिपादन गोपाळ तिवारी यांनी केले.


पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचा राजीव गांधी स्मारक समिती प्रयत्न करणार, लवकरच पुण्यात वाहतूक परिषदेचे आयोजन-
शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी मात्र वर्षानुवर्षे तितकीच असताना, “संभाव्य रस्तारुंदी” गृहीत धरून वाढीव चटई क्षेत्रे मंजुर करून, बांधकामे मात्र प्रचंड वेगाने होत आहेत.असे सांगून गोपाळ तिवारी म्हणाले,’प्रस्तावित रस्ते रुंदी पेक्षा वास्तवतेतील रस्ते रुंदींवर चटई क्षेत्र मंजुर करण्याची खरे तर काळाची गरज आहे.सोसायट्यांचा पुनर्विकास होताना वाढीव एफएसआय घेऊन मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.
त्यातील २०% वाहने जरी रस्त्यावर आली तरी वाहतुक कोंडी होते.. त्यामुळे पुणे शहर सध्या वाहतूक कोंडीच्या तीव्र समस्येला सामोरे जात आहे, येणाऱ्या काळात हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुरेशा रुंद – रस्त्यांच्या नियोजना अभावी मेट्रोचा ४ % वाढीव एफएसआय देणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न पुढे येता त्यामुळे यावर तज्ञांची साधक बाधक चर्चा घडवून आणण्या साठी “वहातुक परिषदेचे” आयोजन, ‘राजीव गांधी स्मारक समिती’च्यावतीने येत्या ८ दिवसात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर केले जाणार असल्याची माहिती गोपाळ तिवारी यांनी दिली. या परिषदेत माजी सनदी अधिकारी, नियोजनकार, वास्तु विषारद, लोक प्रतिनिधी इ उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...