Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लाडकी बहीण योजनेत आर्थिक लूट:अनेक नोंदणी केंद्रांवर महिलांची तुफान गर्दी, काँग्रेसची 15 जुलैच्या तारखेची अट वगळण्याची मागणी

Date:

नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी-15 जुलैची मुदत व्यवहार्य नाही-21 वर्षांवरील अविवाहित महिलांचा काय दोष?६० वर्षावरील महिलांचा दोष काय ?

मुंबई-महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्रांबाहेर महिलांची तोबा गर्दी उसळली आहे. त्यात अमरावती व सोलापुरातील केंद्रांवर एजंटकडून या प्रकरणी 700 ते 800 रुपये घेऊन महिलांची लूट केली जात असल्याची बाब उजेडात आली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना या योजनेच्या नोंदणीसाठी सरकारने ठेवलेली 15 जुलैची अट रद्दबातल करण्याची मागणी केली आहे.

अमरावतीच्या वरूड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोलापुरातही महिलांनी या योजनेसाठी आवश्यक दाखले मिळवण्यासाठी सुविधा केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी एजंटांकडून महिलांकडून दाखले देण्यासाठी 700 ते 800 रुपये घेतले जात आहेत.

दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी ठेवण्यात आलेली 15 जुलैची अंतिम मुद्द रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पात शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिलांना मदत दिली पाहिजे, त्यात कुणाचेही दुमत नाही. पण या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील नोंदणी केंद्रांमध्ये प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी होईल, एवढी मोठी गर्दी दिसत आहे. काही ठिकाणी तर उन्हात उभे राहिल्यामुळे भोवळ येण्याच्याही घटना घडल्या आहेत, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सध्या पंढरीची वारी सुरू आहे. गावोगावच्या पालख्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले आहे. यात अर्ध्याहून अधिक महिला असतात. आषाढी एकादशी 17 तारखेला आहे. त्यामुळे वारीत सहभागी झालेल्या महिलांना 15 तारखेपर्यंत अर्ज भरणे शक्य नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी सरकारने दिलेली मुदत व्यवहार्य नाही. ही योजना सर्वांसाठी खुली असावी. प्रत्येक महिलेला आपण तिचा अधिकार दिला पाहिजे. योजना फक्त निवडणुकीपुरती आणायची आणि नंतर बंद करायची, हे योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले.

लाडकी बहीण योजनेत 21 वर्षांवरील अविवाहित महिलांना वगळण्यात आले आहे. त्यांचा दोष काय? एखाद्या महिलेने लग्न न करण्याचे ठरवले असेल, तर तिला ही मदत मिळणार नाही का? तसेच 60 वर्षांवरील महिलांना कुणी सांभाळणारे नसेल, तर त्यांनाही या योजनेतून वगळणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने नोंदणीसाठीची अंतिम तारीख काढून टाकावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. नोंदणी केंद्राबाहेर दलालांकडून महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याची बाबही चव्हाण यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...