Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अमित शहांचे नेहरूंविषयीचे विधान म्हणजे गहन अज्ञान -अभय छाजेड ही संतापले,म्हणाले,’दोषारोप करून इतिहास कसा बदलता येईल?

Date:

पुणे- संसदेत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी केलेले काश्मीर बाबतच्या विधानावर कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये संतापाची लहर उठली आहे . येथील स्थानिक कॉंग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी याबाबत अमित सहा यांची खरडपट्टी काढली आहे . ते म्हणाले,’इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने कशी केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर व पंडित नेहरू यांच्यासंदर्भात केलेले विधान होय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नेहरूंनी संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याआधी युद्धबंदी केली नसती तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भूभागही भारताकडे राहिला असता. ही टीका करताना पंडित नेहरूंवर चूक केल्याचा आरोप करत असता जम्मू-काश्मीरचे तत्कालीन संस्थानिक हरीसिंग यांच्या घोडचुकीकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करून नेहरुंनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा अजेंडा राबवला आहे.

अभय छाजेड पुढे म्हणाले,’ हरिसिंग यांनी भारतात सामील होण्यास विनाकारण विलंब लावला. महात्मा गांधींनी प्रत्यक्ष काश्मीरला जाऊन हरिसिंगांचे मन वळवायचा प्रयत्न केला, पण हरीसिग त्यालाही बधले नाहीत कारण त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायचे होते. त्यांना तसे भडकावणारे हिंदू महासभेचे एक सर्वेसर्वा होते. हरीसिंगांच्या निर्णय घेण्यातील विलंबाचा गैरफायदा घेत पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मीरवर आक्रमण केले तेंव्हा कोठे हरिसिंग यांना जाग आली व पंडित नेहरूंकडे लष्करी सहाय्याची मदत मागितली. गांधीजींनीही या लष्करी मदतीला अनुमती दिली. तरीही सामील होतांना हरिसिंग यांनी आपला हट्ट सोडला नाही व त्यातूनच त्यांच्याच हट्टाने ३७० कलमाची निर्मिती झाली.

भारतीय सैन्याने पाकपुरस्कृत टोळीवाल्यांना खो-यातून हाकलण्यात यश मिळवले, पण युनोने (नेहरूंनी नव्हे) युद्धविराम घोषित केल्याने पुढील भाग आजतागायत तसाच पाकच्या ताब्यात राहिला. नवजात राष्ट्राला देशातील साडेपाचशे संस्थाने विलीन करून घ्यायची होती आणि अनेक आघाड्यावर संघर्ष करत राष्ट्राची उभारणी करायची होती. तरीही पंडित नेहरूंनी देशाची घटना अंमलात आल्यापासून (१९५०) ३७० कलमांतर्गत येणा-या तरतुदी एकामागून एक रद्द करत नेण्याला सुरुवात केली आणि ते शेवटी नावालाच राहिले.

हरीसिंगांनी भारतात सामील होण्याचा निर्णय बेळीच घेतला असता तर मुळात हा प्रश्नच उद्भवला नसता हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. पण या नावालाच राहिलेल्या कलमाला रद्द करून राष्ट्रप्रेमाचा डंका बडवणे एवढेच माहित असलेल्या अमित शहांनी अशा स्थितीत हरीसिंगांच्या भारतात सामील व्हायचा निर्णय पाक आक्रमणाच्या विपरीत स्थितीत व उशीरा घेण्याच्या अदूरदृष्टीला दोष देण्याऐवजी देशाची भक्कम उभारणी करणा-या पंडित नेहरुंना दोष देणे म्हणजे काही लोकांच्या मनात नेहरू द्वेष किती ठासून भरला आहे याचे कुटील दर्शन घडवणे आहे. अमित शहा यांनी इतिहासाचा आणि तत्कालीन राष्ट्रीय आणि जागतिक स्थितीचा थोडा जरी अभ्यास केला असता तर अशी बेजबाबदार विधाने त्यांनी केली नसती असेही अभय छाजेड यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...