मुंबई-महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. तत्पूर्वी विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला गेला. त्यानंतर सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अधिवेशनाची भूमिका मांडली.
फडणवीस म्हणाले की, खोट बोल पण रेटून बोल, असे खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीत यश मिळाले तर आता खोटेच बोलायचे आहे. किंबहुना त्यांनी दिलेले पत्राचे एका वाक्यात उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात त्यांचा चेहरा पाहिले पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातोय. सरकार प्रत्येक प्रश्नावर बोलायला तयार आहे.
फडणवीस म्हणाले ,विदर्भातील सिंचन प्रश्नावर सरकारवर अपयश, असे म्हणतात. पण हे अपयश हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहे. मध्यंतरी सरकारमध्ये पैनगंगा प्रकल्पाचे फाईल हलली नाही. त्यांच्या काळात विदर्भातील एका प्रकाल्पाला मान्यता दिली नाही. वैधानिक विकास मंडळ त्यांनी बंद केले पण आम्ही स्वत: त्याला प्रस्ताव देऊन चालू केले. ते आम्हाला विचारतात. वॉटर ग्रीडचे काय झाले. पण त्यांनीच या मराठवाड्यातील वॉटर ग्रीड रोखले होते.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातच सर्वाधिक पेपरफुटीचे प्रकरण घडले. त्याच्यात गुंतवणूकदारांकडून महाराष्ट्कराकजे पाठ फिरवल्याचे सांगतात. पण त्यांना विसरतात की, तीन नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात पहिल्या क्रमांकावर आले आहे.
ड्रग्जच्या विरोधात आम्ही लढाई सुरू केली. संपूर्ण देशात लढाई सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात ही कारवाई होऊ लागली आहे. त्यामुळे ही कारवाई थांबणार नाही. कायदा सुव्यवस्था असो की झीरो टॉलरन्स धोरण ठेवून ड्रग्जवर कारवाई होत आहे. अनेक विषय विरोधी पक्षाने मांडले. पण जितक्या वेळा ते बोट आमच्याकडे उगारतात पण तितक्या वेळा चार बोट यांच्याकडे होतात. खिचडी घोटाळा, मृतदेहाचे बॅगा खाल्ले, मीडियामध्ये बोलण्यापेक्षा सभागृहात बोलावं, त्याची उत्तर आम्ही देऊ. सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ. या काळात चांगला अर्थसंकल्प मांडला जाईल. विकासाला बळ देणारे हे अधिवेशन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांची चर्चे करण्याची इच्छा नाही. दिलेल्या पत्रात कोणतेही मुद्दे नाहीत. तेच तेच मुद्दे या ठिकाणी मांडले जात आहेत. खोटे बोल रेटून बोलण्याची यांची मानसिकता आहे. स्वतंःची पाठ थोपटून घ्यायची ही त्यांची प्रवृत्ती आहे.
या निवडणुकीत कोणाचे अपयश आहे. गावागावात जाऊन खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही लोकसभेत यश मिळाले आहे. छाती फुगून यावेळी विरोधक मीडियासमोर आले असतील. मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. उबाठामध्ये विरोधात लढलो. फसवून तुम्ही लोकांकडून दिशाभूल केली आहे. आमची या अधिवेशनात सर्व तयारी आहे. सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून सरकार पडते असता प्रचार केला. देव पाण्यात बुडून विरोधक बसले आहेत. विरोधकांनी शेतकऱ्यांना काय दिले. शेतकऱ्यांबद्दल भाष्य केले जाते. त्यात आम्ही निकष बदलले.