राम ही बहुजनांची संस्कृती,श्रीराम नव्हे – संजय सोनवणी

Date:

चौफुल्यात तिसरे राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलन संपन्न

केडगांव, ता.१८ : प्राचीन काळापासून मातृसत्ताक संस्कृतीमध्ये महिलांना मानाचे स्थान होते. राम राम घालून माणुसकी जिवंत ठेवणारी राम ही बहुजनांची संस्कृती आहे. श्रीराम नाही,असे परखड मत इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ( ता.दौंड ) येथे तिसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाचे उदघाटन स्वागताध्यक्ष दिग्विजय जेधे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून संजय सोनवणी बोलत होते.

राज्यभरातून आलेले साहित्यिक, लेखक,कवि,कलावंत यांनी स्वर्गीय डी. के.खळदकर साहित्यनगरीत आपले साहित्य सर्वासमोर सादर केले व याचा रसिकवर्गाने मनमुरादपणे आनंद लुटला.

यावेळी संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव,जलदगती न्यायालय मुंबई चे न्यायाधीश वसंत पाटील, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, जयप्रकाश वाघमारे, रेखा काळे, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, सुषमा काळे, अभिनेता सागर शेलार,तानाजी केकाण, नितिन भागवत,भाऊसाहेब फडके,विश्वास माने, मोहन जाधव, सागर फडके, वसंत साळुंखे, संजय मेढे, तेजस टेंगले,दत्तात्रय डाडर,बाळासाहेब काळे, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दीपक पवार, राजाभाऊ जगताप, बाळासाहेब मुळीक,विनायक कांबळे, जगदीप वनशिव,रविंद्र खोरकर, रामभाऊ नातू उपस्थित होते.

भीमथडी साहित्य संमेलनाची सुरवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संजय सोनवणी म्हणाले, “बहुजन समाजाने रामायण, महाभारत काळाच्या अगोदर पासून मानवतावादी मुल्ये जपली, पुरुषोत्तम राम लोकांनी मनोभावे स्वीकारला. नमस्कार घालताना राम राम म्हणायचे ही बहुजनांची संस्कृती आहे, यातून माणुसकी, समता, बंधुभाव जोपासना केली जाते. उत्तर भारतात आक्रमण केलेल्या आर्यांनी स्वतः चा प्रभाव निर्माण करण्यासाठी मूळ निवासी भारतीय संस्कृती मोडीत काढताना त्यात बदल केले. पण बहुजनांनी त्याचा कधी स्वीकार केला नाही. शेवटी त्यांना बहुजन, देवता व महापुरुषांचा आधार घ्यावा लागला. मानवी मुल्य जोपासने ही रामाची संस्कृती आहे तर धर्म आणि जातीमध्ये दुरावा करणे ही श्रीरामाची संस्कृती आहे. प्राचीन काळापासून समाजात महिला ही प्रमुख होती. मातृसत्ताक संस्कृती मोडीत काढून पुरुष सत्ताक संस्कृती वैदिकांनी बिंबविण्याचे काम केले.

दिग्विजय जेधे म्हणाले, “शिवफुलेशाहु महराजांचा विचार समाजात रुजविण्याचा देशभक्त केशवराव जेधे व सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांनी प्रयत्न केला. समाजाला एकसंध ठेवणारा विचार साहित्यिकांनी शब्दबद्ध करण्याची गरज आहे.भीमथडी साहित्य संमेलनाची ज्योत कायम प्रज्वलित राहणे गरजेचे आहे. भीमथडी चा इतिहास प्रेरणा देणारा आहे.”

प्रास्ताविक करताना दशरथ यादव म्हणाले, “ग्रामीण भागातील साहित्य अजून ही पुस्तकात हवे तेवढे शब्द बद्ध झाले नाही. राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करतात ही गंभीर बाब आहे. समाज मन सक्षम नसेल तर भौतिक प्रगती करून त्याचा उपयोग होणार नाही. साहित्याने समाज सक्षम होतो याचा विसर पडला आहे. साहित्याने क्रांती होते. प्रेरणा मिळते. संमेलनामुळे भीमथडी चा प्रेरणादायी इतिहासातला उजाळा मिळेल.” यावेळी संजय मेढे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि पवार यांनी केले व आभार दिपक पवार यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...