शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील मशीदी, दर्ग्यांचे अतिक्रमण हटवा:भाजप आमदार टी. राजांची मागणी

Date:

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुमारे 370 किल्ले जिंकले आहेत. मात्र, आज त्यातील 100 किल्ल्यांवर मशीदी आणि दर्गे बांधण्यात आले असल्याचे टी. राजा यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरील हे सर्व अतिक्रमण हटवण्याची मागणी टी. राजा यांनी केली आहे.

मुंबई-लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असा दावा भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी केला आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रक्षोभक वक्तव्य करणारे टी. राजा सिंह यांना आमंत्रीत करण्यात आले होते. त्यांच्या या कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्या वतीने आधीच आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे ते या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले हाते.

वक्फ बोर्ड रद्द करावा, अशी मागणी देखील टी. राजा यांनी या वेळी केली. महाराष्ट्रात 1 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात 10 लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा, तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत असे आवाहन देखील आमदार टी. राजा सिंह यांनी केले आहे.

धर्मसभेत महत्त्वाच्या ठरावांना मंजूरी

धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा
वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा
लव्ह जिहादविरोधी कायदा मंजूर करावा
गोहत्या बंदी कठोर करून त्याची अंमलबजावणी व्हावी
बेकायदेशीर भूमीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...