मुंबई-अण्णा हजारे जागे झाले त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन आंदोलन करावे. आम्ही सर्व देखील त्यांच्यासोबत बसून आंदोलन करू.आणि आता RSS पडद्यामागे राहून प्रवचन झोडू नये त्यांनी ठरवले तर मोदींचे 15 मिनिटेही सत्तेत राहणार नाही असे वक्तव्य येथे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहू नये, प्रवचन न झोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी. RSS ने ठरवले तर मोदींचे सरकार 15 मिनिटेही सत्तेत राहू शकणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर गेल्या 10 वर्षांत या देशात फक्त अहंकार, इर्षा, बदल्याचे राजकारण हेच पहायला मिळाले. सत्तेचा गैरवापर झाला असेही राऊतांनी म्हटले आहे.अण्णा हजारे जागे झाले त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. अण्णा हलले, अण्णा बोलले, अण्णांनी पत्र लिहले त्यासाठी मी त्यांचे अभार मानतो. पण या महाराष्ट्रात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या दहा वर्षात घोटाळेच घोटाळे झालेले आहे. घोटाळ्यांचा पाऊस पडला आहे. इलेक्ट्रॉल घोटाळ, ईडी व सीबीआय़चा वापर करून जी खंडणी गोळा केली जाते तो घोटाळा, आयएनएस विक्रांत घोटाळा यावरही अण्णा हजारे यांनी आवाज उठवावा. एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या 40 आमदारांच्या घोटाळ्यांवरही लक्ष दिले पाहिजे. या विरोधात अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन आंदोलन करावे. आम्ही सर्व देखील त्यांच्यासोबत बसून आंदोलन करू.
दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, लोकसेवकाला अहंकार नसावा, असं काल सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. भाजपचे सध्याचे जे मोदींचे सरकार आहे ते अहंकारी सरकार आहे. त्याला सुरुंग लावण्याचे काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत, असे मी मानतो, असे राऊतांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपने तीस पेक्षा जास्त जागांवर चोरी केलीय. तीस पेक्षा जास्त जागांवर भाजप हरली आहे. मात्र तिथे भाजपने दबाव आणून विजय मिळवला आहे. भाजप हरलीय, मोदी हरलेयत, शहा हरलयेत, वाराणसी, अयोध्या हरले, चित्रकूट, रामेश्वरम, रामटेक, नाशिकमध्ये हरले. जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते त्या पवित्र भूमीवर अहंकाराचा पराभव झालाय. रावण अहंकारी होता म्हणून प्रभू श्रीरामाने त्यांचा वध केला. आज तोच अहंकार रामाच्या नावावर चालला होता. लोकशाहीत मतपेटीतून जनतेने अहंकाराचा पराभव घडवून आणला आहे. अद्याप ते पूर्णपणे पराजित नाही झाले्ले नाही त्यामुळे आता ते काम संघाला करावे लागेल. संघाने ठरवले तर मोदींचे सरकार 15 मिनिटेही सत्तेत राहू शकणार नाही. मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग लावण्याचे काम जर संघ करत असेल तर ते त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत असे मी मानेन, असे राऊत म्हणाले.