Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महापालिकेचा कारभार म्हणजे ‘बैल गेला अन झोपा केला- ३ वेळा पुणे पाण्यात गेल्यावर ९८ कोटीचे टेंडर मंजूर …

Date:

पुणे- पूर स्थितीवर मात करण्यासाठी दरवर्षी शेकडो कोटी ची उधळण करणाऱ्या महापालिकेने यंदाही आपला हेका काही सोडलेला नाही आता ३ वेळा पुणे पाण्यात गेल्यावर सुमारे ९८ कोटीचे टेंडर्स महापालिकेने काढले आहेत. जे काल स्थायी समितीच्या गुप्त बैठकीत मंजूर करण्यात आले. स्थायी समिती , मुख्य सभा अगदी गुप्त पद्धतीने किंवा लॉबी करून सुरु ठेवलेल्या महापालिकेने याहून अधिक वेगळे करणे अर्थातच अपेक्षित नव्हतेच .

शहरात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडालेली असताना प्रशासनावर सडकून टीका केली जात आहे. नाले सफाई न करणे, पावसाळी गटारांची स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवलेली आहे.असे असताना केंद्र सरकारच्या योजनेतून पुणे शहरा पूर स्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केली जाणार असून, त्या कामाच्या ९७ कोटी ९४ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने काल मान्यता दिली. यातून शहराच्या विविध भागात पूर स्थिती रोखण्यासाठी कामे केली जाणार आहेत.केंद्र सरकारने अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट (शहरी पूर जोखीम व्यवस्थापन) योजना तयार केली आहे. यामध्ये पुणे, मुंबईसह चेन्नई, कोलकता, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद या सात शहरांचा समावेश असून, या शहरांमध्ये पूर स्थिती रोखण्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची योजना तयार केलेली आहे.यामध्ये पुणे महापालिकेला पुढील पाच वर्षात २५० कोटी रुपये मिळणार आहेत. महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली आहे. शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी मूलभूत बदलांसह तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पुढील पाच वर्षात १४ व्या आणि १५व्या वित्त आयोगातून पुणे शहराला हा निधी उपलब्ध होईल.

या कामाचे पाच टप्पे असून पहिल्या टप्प्यात पावसाळी गटार टाकणे, काँक्रिट कॅनॉल करणे, भूजल पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, नाला खोलीकरण करणे, डोंगरावर चर खोदून पावसाचे पाणी जिरवणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी १४७ कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते.त्याची निविदा मार्च महिन्यातच मान्यतेसाठी ठेवण्यात येणार होती, अर्थात आपत्कालीन कामांना आचारसंहितेचा अडसर नसतो तरीही पण आचारसंहितेपर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा प्रस्ताव रखडला होता असे कारण दिले जाते आहे . लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठल्यानंतर पहिल्याच बैठकीत प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता दिली असेही सांगण्यात येते .

या कामासाठी मागविलेल्या निविदेत पाटील कंस्ट्रक्शन अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने १६.२१ टक्के कमी दराने निविदा भरली. ही निविदा पात्र ठरल्यानंतर आज स्थायी समितीमध्ये ९७ कोटी ९४ लाख ६९ हजार ८४२ रुपयांची निविदा मान्य झाली आहे.आराखड्यामध्ये सर्वाधिक जोखीम असलेल्या ६० ठिकाणी उपाययोजना करणार

  • शहराच्या विविध भागात ६०० मिमी, ९०० मिमी, १ हजार मिमी व्यासाच्या पावसाळी गटार टाकणार
  • १२०० ठिकाणी भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्ज बोअर घेणार
  • शहरातील प्रमुख नाले खोल करून पुराचा धोका कमी करणार
  • शहरात अनेक टेकड्या आहेत, तेथे चर खोदून पाणी जिरवण्यावर भर देणे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...