पुणे- स्मार्ट सिटी , गेली ७/८ नव्हे तर १० वर्षे उत्तमकामकाज अन महापालिकेला राष्ट्रीय स्तरावरची विविध पारोतोषिके मग नेमके हे होते तरी कसे , धो धो करत पाऊस येतो धाऊन आणि महापालिकेची हि सारी पारितोषिके जातात वाहून … साऱ्या दिल्ली दरबारच्या पारितोषिकांची पितळे उघडी पडतात . जे काम सलग ५ वर्षे विरोधी पक्ष करू शकत नाही ते काम अवघ्या काही मिनटात पाऊस करून जातो ..आणि पालिकेच्या कारभाराचे धिंडवडे उडवून जातो.. आता यापेक्षा अधिक पुरावे कोणी मागू नये सोशल मीडिया वरून व्यक्त होणाऱ्या या भावनांची कदर मनामनात होते आहे . काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी ती आयुक्तांच्या दालनात याही वर्षी पोहोचविली
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये पुणे शहरात पावसाळी परिस्थितीमुळे उद्भवलेला हाहाकार व नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय या बबातची जाणीव आयुक्त यांना करून देण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी माजी आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजात शेट्टी, महिला अध्यक्षा पुजा आनंद, समीर शेख, संतोष आरडे, सुनिल शिंदे, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, मेहबुब नदाफ, सुजित यादव, हेमंत राजभोज, रमेश सकट, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, सतिश पवार, प्रदिप परदेशी, रवि ननावरे, राजेंद्र शिरसाट, जयसिंग भोसले, शिवराज भोकरे, आशितोष शिंदे, सुंदर ओव्हाळ, प्रकाश पवार, सुनिल घाडगे, रवि पाटोळे, ऋषिकेश बालगुडे, महेश हराळे, नारायण पाटोळे, रवि आरडे आदींसह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.