नवी दिल्ली-एनडीए आजच सरकार स्थापनेचा दावा करू शकते. यासाठी सर्व एनडीए पक्षांचे नेते संध्याकाळी 7.45 वाजता राष्ट्रपती भवनात पोहोचतील. एनडीएच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.दरम्यान, पंतप्रधान मोदींनी राजीनामा दिल्यानंतर आणि मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा विसर्जित केली.
पंतप्रधान निवासस्थानी एनडीएची बैठक सुमारे 10 हून अधिक पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये JDU नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू, AJSU प्रमुख सुदेश महतो, RLD चे जयंत चौधरी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, LJP (रामविलास) नेते चिराग पासवान, अपना दल. (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया पटेल आणि HAM नेते जीतन राम मांझी यांचा समावेश आहे.
या बैठकीला 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या खासदारांची 7 जूनला बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ते राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. राजनाथ सिंह, अमित शहा आणि जेपी नड्डा यांना सर्व मित्रपक्षांशी वन टू वन बोलण्याची आणि नवीन सरकारच्या स्वरूपावर चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.