Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आनंद नोंदवण्यापेक्षा अनुभवा; बेभान होण्याऐवजी तल्लीन व्हा!

Date:

डॉ. सलील कुलकर्णी यांचे प्रतिपादन; ‘समवेदना’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मना तुझे मनोगत’ विशेष कार्यक्रम
पुणे :
“आभासी जगात एकमेकांकडे बघून बोलण्याचे प्रमाण कमी झाले. संवादातील भावना हरवत चालली आहे. आनंद अनुभवण्यापेक्षा तो नोंदवण्यावर, तसेच एखाद्या कलाकृतीत तल्लीन होण्याऐवजी बेभान होण्याकडे आपला अधिक कल असतो. तणावमुक्त, मनःशांतीचे जीवन जगण्यासाठी बेभान न होता तल्लीन होऊन आनंदानुभूती घ्यावी,” असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले.
समवेदना संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. कुलकर्णी यांच्या ‘मना तुझे मनोगत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सलील कुलकर्णी यांनी पालकत्व, मुलांशी संवाद, नातेसंबंध व कथाकथन अशा विविध विषयांवर गप्पा, संगीत, गाणी व कवितांच्या माध्यमातून त्यांच्या अनोख्या शैलीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. श्रद्धा कुलकर्णी यांनी डॉ. कुलकर्णी यांची दिलखुलास मुलाखत घेतली.
मयूर कॉलनीतील एमईएस बालशिक्षण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ होते. प्रसंगी ‘समवेदना’चे संस्थापक डॉ. चारुदत्त आपटे, विश्वस्त प्रकाश तुळपुळे, सल्लागार राजीव साबडे, ज्येष्ठ सदस्य बापू पोतदार, मुख्य व्यवस्थापक अमर पवार आदी उपस्थित होते. देणगीदार व हितचिंतकांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, “संवादात भावनेला, सहजतेला खूप महत्व आहे. आजी-आजोबांकडून, आई-वडिलांकडून नकळतपणे सांगितलेल्या गोष्टीतून संस्कार होतात. ‘एकदा काय झालं’ ही कलाकृती अनुभव संपन्न करणारी आहे.अनुभवी लोकांनी पुढच्या पिढीतील लोकांना चांगल्या गोष्टी सांगायला हव्यात. नातवंडांना, मुलांना सांगायला हवे. आधीच्या पिढीने भान सांभाळले पाहिजे. तर्क सांगितले पाहिजेत. दोन पिढ्यांमधील दोन माणसांचे नाते ओघवते, सहज व आत्मीयतेचे असावे.”
अमर पवार यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आरोग्य क्षेत्रात कार्यरत समवेदना संस्था उपचार, प्रतिबंध आणि प्रसार या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रम राबविते. गरीब रुग्णांना आर्थिक मदत, शालेय आरोग्य व महिलांसाठी कॅन्सर उपक्रमासोबत मानसिक स्वास्थ्याचा विषयही हाती घेतला आहे. यंदा समवेदना उपक्रमांचा २०,००० हून अधिक शहरी व ग्रामीण व्यक्तीनी लाभ घेतला. यामध्ये १२००० पेक्षा अधिक शालेयवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांसोबत काम करताना त्यांच्या सामाजिक आणि मानसिक समस्या समोर येत आहेत. त्यावर संस्थेने काम सुरु केल्याचे अमर पवार यांनी नमुद केले.
डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनीही मनोगत व्यक्त करत समवेदना संस्थेच्या कार्याचा गौरव केला. आरोग्य सेवेत सरकारी यंत्रणा अपुरी पडते. अशावेळी समवेदना संस्थेचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शरयू जावळे यांनी आभार मानले.

मनाला भावणाऱ्या रचनांनी श्रोते मंत्रमुग्ध

लतादीदी माझ्यासाठी परमेश्वर आहेत. माझी त्यांच्यावर भक्ती आहे. त्यांच्यासमवेत मला गाणे करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असून, त्यांचा सहवास राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा मोठा आहे. दीदींसह पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुधीर मोघे, आरती प्रभू, बा. भ. बोरकर, संदीप खरे यांच्या अनेक रचना, त्यांच्याबरोच्या हृद्य आठवणी डॉ. सलील कुलकर्णी यांनी सांगितल्या. तसेच आता विसाव्याचे क्षण… दिवस असे की माझा कोणी नाही… भय इथले संपत नाही… ऊस डोंगपरी रस नव्हे डोंगा… तुम आगर रूठ ना जाओ… तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हूं मैं… लग जा गले… भीमरूपी महारुद्र… विश्वासाची संजीवनी दे… अशा रचनांनी मंत्रमुग्ध केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...