‘लोकशाही हीच सत्याग्रहाची फलश्रुती’ :डॉ. अशोक चौसाळकर

Date:

पुणे :

‘अगदी लहान मुलाला सत्याग्रहातून आत्मबळ मिळाल्याने स्वातंत्र्य लढा व्यापक झाला आणि भारताला लोकशाही मिळाली ,हीच सत्याग्रहाची फलश्रुती आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी बुधवारी सायंकाळी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी लिखित ‘सत्याग्रह विचार’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन(कोथरूड) येथे ज्येष्ठ विश्लेषक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांच्याहस्ते झाले.यावेळी चौसाळकर बोलत होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संयोजन समितीच्या वतीने अन्वर राजन,संदीप बर्वे आणि जांबुवंत मनोहर यांनी स्वागत केले.

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे विचार मराठीत यावेत यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर यांनी विशेष प्रयत्न केले.त्यातून ‘सत्याग्रह विचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. प्रथमावृत्तीचे प्रकाशन मामासाहेब देवगिरीकर यांच्याहस्ते झाले होते.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे द्वितीय अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.महात्मा गांधींच्या विचारांचे सार या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे एकूण २० खंड आहेत.त्यातील चौथ्या खंडाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, अरूण खोरे, संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर आदी उपस्थित होते. अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक अन्वर राजन यांनी केले.

डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले,’ महात्मा गांधी यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. सत्याग्रहाचे आचरण आणि त्याचा आशय अंगी बाणवला पाहिजे.सत्याग्रह ही मजबुरी नाही. तर अन्याय सहन न करता तीव्र आणि अहिंसात्मक प्रतिकार करणे हे सत्याग्रहाचे सार आहे. निर्भिडपणा येतो. भीतीने नैतीक अधःपतन होते.आत्मबळाने आपण व्यवस्थेला आव्हान देऊ शकतो. सत्याग्रहाने सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर परिणाम होतात.सत्याग्रह करणाऱ्यांचा उपहास, निंदा केली जाते, दडपशाही केली जाते. सत्याग्रहाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतो.या कसोट्यातून उत्तीर्ण झाल्यावर आदर निर्माण होतो.व्यक्तीच्या ह्रदय परिवर्तनासाठी सत्याग्रह आवश्यक आहे. सत्याग्रहीने उद्दीष्टापासून हटू नये. सत्याग्रहींच्या सामूहिक आत्मबळातून देखील मोठे परिवर्तन घडते.भौतिक लाभ मिळवणे हा सत्याग्रहाचा उद्देश नसतो, असेही डॉ. चौसाळकर यांनी सांगितले.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ परिवर्तनासाठी आपण रोज प्रयत्न केले तर सामान्य माणूस देखील महात्मा होतो, ही सत्याग्रह आणि सर्जनशिलतेची ताकद आहे. समाजवादी मंडळी गांधीवादी झाल्याशिवाय ते काल सुसंगत ठरणार नाहित.लोकशाहीची प्रतिनिधि शाही होवू नये असे वाटत असेल तर सत्याग्रह सामाजिक जीवनात असला पाहिजे. वैयक्तिक जीवनात देखिल सत्याग्रह हे महत्वाचे मूल्य आहे’.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...