Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

देशावरील ४ पट वाढवलेल्या कर्ज-फेडी बाबत मोदींची गॅरंटी का नाही..? काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचे सवाल

Date:

‘मोदी काळातील’ वाढीव कर्ज फेडण्याचा संकल्प भाजपच्या जाहीरनाम्यात का नाही..?
पुणे दि १९ –मोदी सरकार येण्यापूर्वी २०१४ पर्यंत, डॅा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए १ आणि २ अंतर्गत देशाने जीडीपी वाढीचा दर, आयात-निर्यात दर, ‘डॉलर-प्रती रुपयाचा दर’ योग्यर्त्या नियंत्रित राखला तसेच महागाई दर ही नियंत्रित केला होता.
परंतु २०१४ अखेर देशावर असलेली एकूण कर्जाची थकबाकी ५३.८७ लाख कोटी रुपये होती ती मात्र आज (२०२४)मध्ये सु २०५ लाख कोटीच्या घरात गेली असल्याने या “वाढीव कर्ज फेडी बाबत” भाजप च्या जाहीर नाम्यात कुठेही मोदींची गॅरंटी वा नियोजन वा कोणताही संकल्प का दिसत नाही.. असा सवाल करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “मोदी सरकार देशावरील स्वकाळात वाढलेले चौपट कर्ज सोईस्कर लपवत असल्याची प्रखर टीका काँग्रेस ने केली..!
२००९-२०१४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहन सिंग सरकारने कच्चे क्रुड तेल सु १२६ डॉलर ने खरेदी करून सुध्दा, देशवासियांना पेट्रोल ६८ रुपये प्रति लिटर, डीझेल ३९ रुपये प्रति लिटर आणि घरगुती एलपीजी गॅस ३९० रू च्या किंमतीत उपलब्ध करून दिला होता.
तरीही UPA सरकार काळात ‘भारत आर्थिक महासत्ता’ होऊ घातला होता’..याचे स्मरण देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी करून दिले.
काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी डॅा मनमोहनसिंग सरकार पाय उतार होण्यापुर्वी, देशाची तत्कालीन आर्थिक परिस्थितीच्या वास्तवाची आठवण करून देताना सांगितले की, भारतावर २०१४ पर्यंतच्या एकुण ६४ वर्षात व सु १४ पंतप्रधानांची कारकिर्द मिळून, मात्र ५३.८७ लाख रुपयांचे कर्ज होते, मात्र आज मोदी सरकारच्या एकाच पंतप्रधान पदाच्या व १० वर्षांच्या काळात (२०२४)मध्ये कर्जाची रक्कम सु २०५ लाख कोटीच्या घरात गेली असल्याने या “वाढीव चारपट कर्ज फेडी बाबत” भाजप’च्या जाहीर नाम्यात कुठेही मोदींची गॅरंटी वा संकल्प दिसत नाही..!
तसेच देशातील राष्ट्रीय बँकांची लुट करून मल्या, मोदी, चोकसी, ऋषी अग्रवाल इ नी नेलेला पैसा परत आणणे बाबत मोदींनी ‘जाहीर नाम्यात’ अवाक्षर ही काढलेले नाही..या विषयी काँग्रेस राज्य प्रवक्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
स्वतःच्या अपयशाचे खापर सतत पुर्वीच्या सरकारवर, नेहरू – गांधीवर फोडून मोदी सरकार नामा निराळे होऊ शकत नसल्याचे सांगितले.
मोदी सरकारचा कार्यकाळ ‘किमान काही अंशी तरी दाखवण्या सारखा असता तर २०१४ ते २०२४ एकुण वाढलेल्या कर्जाबाबतची वास्तवता दर्शवणारी श्वेतपत्रिका जारी केली असती..! मात्र आरबीआय गंगाजळीस पहील्यांदा हात लावण्याची नामुष्की येणाऱ्या व देशास कर्जबाजारी करणाऱ्या भाजपला मोदींच्या ऊधळपट्टीमुळे देशावरील ‘चौपट वाढीव कर्जाची’ जबाबदारी ही भाजपला घ्यावी लागेल केवळ ‘मोदी हमी’चा प्रपोगंडा करत, रामा’चे नांव घेत व चोरीचे समर्थन करीत भाजप पळ काढू शकणार नाही..! देशाच्या बुडत्या अर्थव्यवस्थेचे उत्तर भाजपला भावी काळात द्यावे लागेल, असा इशाराही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिला..!

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...