Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मानवाला एकत्वाच्या सूत्रात गुंफणारा – मानव एकता दिवस

Date:

संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम बरोबर व्यापक देशव्यापी रक्तदान अभियान व सत्संग समारोहांचे आयोजन
 
पुणे, २० एप्रिल, २०२४-
            सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात ‘मानव एकता दिवस’ मुख्य समारोहाचे आयोजन बुधवार, दि.२४ एप्रिल, २०२४ रोजी ग्राउंड नं. २, निरंकारी चौक, बुराड़ी, दिल्ली येथे करण्यात आले आहे. हा दिवस युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांचे परोपकारी जीवन आणि त्यांच्या लोककल्याणकारी भावनेला समर्पित आहे. या कार्यक्रमात दिल्ली व आजुबाजुच्या राज्यांमधून हजारोंच्या संख्येने श्रद्धालु भक्त सहभागी होऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पण करतील आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्याबरोबरच सद्गुरुचे अनमोल प्रवचन श्रवण करतील.
            पुणे झोन मध्ये संत निरंकारी सत्संग भवन,गंगाधाम त्याचबरोबर इतर अठरा ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी मंडळाचे पुणे झोनचे प्रभारी आदरणीय श्री.ताराचंद करमचंदानी यांनी माहिती देताना सांगितले, की सद्गुरुच्या असीम कृपेने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अवघ्या विश्वामध्ये विविध ठिकाणी संत निरंकारी मिशनची समाजकल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक स्तरावर आयोजन केले जाईल ज्यामध्ये मानवतेच्या भल्यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत केले जाईल.
            पुण्यामध्ये संत निरंकारी सत्संग भवन ,गंगाधाम येथे आयोजित  शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यासाठी ससून,वाय.सी.एम,कमांड अशा विविध इस्पितळांचे प्रशिक्षित डॉक्टर्सची टीम सहभागी होणार आहे. त्याबरोबर इतर राज्यांमध्ये तेथील स्थानिक इस्पितळाचे डॉक्टर्स व नर्स रक्त संकलित करण्यासाठी उपस्थित राहतील. याशिवाय सर्व ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात येईल. रक्तदानाच्या जनजागृतीसाठी मिशनचे सेवादार आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी प्रेरणा देत आहेत.
            युगप्रर्वतक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आपले संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित केले; त्यांनी ब्रह्मज्ञानाद्वारे मानवाला मानवाशी जोडून प्रेम व गोडीगुलाबीने नांदण्याची निर्मळ धारा प्रवाहित केले व प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपले स्थान निर्माण केले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील. त्यांची दिव्य शिकवण वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सत्य ज्ञानाच्या रूपात सर्वत्र प्रवाहित करत आहेत ज्याच्या प्रकाशाने प्रत्येक मानव आपले जीवन सकारात्मक रूपात कल्याणकारी बनवत आहे.
 
रक्तदान महादान – सेवेचे लक्ष्य महान
 उल्लेखनीय आहे, की युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांनी सन् १९८६ मध्ये सुरु केलेल्या रक्तदानाच्या परोपकारी मोहिमेने आता महाअभियानाचे रूप धारण केले असून त्याचा चरमोत्कर्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. या शिबिरांमध्ये आतापर्यंत १३,३१,९०६ युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले असून या सेवा निरंतर जारी आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...