कॉंग्रेसमध्ये हयात गेली,३० वर्षे नगरसेवक म्हणूनच गणना झाली,सरतेशेवटी कामाच्या बळावर लोकसभा मागितली,न्यायाच्या प्रतिक्षेची परिसीमा झाली ?

Date:

पुणे-ज्यांनी पक्षांतरबंदी कायदा आणला त्याच कॉंग्रेसने निष्ठावंतांवर अन्याय करून पक्ष बदलून आलेल्यांना पायघड्या टाकू नये अशी मागणी आता रवींद्र धंगेकर यांचे नाव लोकसभेसाठी आघाडीवर असल्याच्या बातम्यांच्या आधारे केली जाते आहे,निष्ठावंतांवर अन्याय करून अशा पद्धतीने उमेदवारी दिली तर कठीण आहे असाही सूर आवळला जातोय कॉंग्रेस मधील लोकसभा इच्छुकांमधील स्पर्धा आता तीव्र होत असून यात आबा बागुल यांच्यावर पक्षाने अन्याय चालविला असल्याचे वातावरण पसरते आहे.7 वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना नगरसेवकाची,आमदारकीची उमेदवारी मिळाली,पण पक्षात हयात घालविलेल्या,३० वर्षे नगरसेवक राहिलेल्या आबा बागुलांना लोकसभा मागावी लागते आणि तरीही उमेदवारी मिळेना या वातावणामुळे पक्षाच्या मतदारांपर्यंत निष्ठावांतांची पक्षातील दुरवस्था पोहोचू पाहते आहे.

पुण्यात लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ किंवा जगदीश मुळीक यांना भाजपने उमेदवारी दिली तर कॉंग्रेसला पुण्याचा हातून निसटलेला बालेकील्ला सहज पुन्हा मिळविता येईल असे स्पष्ट चित्र असल्याचा दावा सगळीकडून होतो आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल ३० वर्षे नगरसेवक म्हणूनच पक्षात कार्यरत राहिलेले आबा बागुल यांनी आपल्या निष्ठेच्या आणि कामाच्या बळावर लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे आणि त्यांना उमेदवारी मिळाली…आणि आमदार धंगेकर यांच्यापासून शहर अध्यक्ष,माजी शहर अध्यक्ष या सर्वांनी त्यांच्या निष्ठेला साथ दिली तर निष्ठावंतांना कॉंग्रेस पक्ष विसरत नाही त्यांच्या पाठीशी राहतो असाच संदेश जाईल.मात्र कॉंग्रेसचे प्रादेशिक नेते आबा बागुलांच्या पाठीशी का राहत नाहीत ?हे गूढ अद्याप उकलेनासे झाले आहे. धंगेकर यांचे नाव निश्चित होईल असे सांगून त्यामागे जो ‘निवडून येण्याचा ‘निकष लावला जातोय, तोच निकष बागुल यांच्या बाबत मान्य का होत नाही ? असा प्रश्न विचारला जातोय.काँग्रेसकडून कसब्याचे आमदार धंगेकर यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.लोकसभेसाठी ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा माध्यमातून आणि फलक बाजीतून होते आहे, त्या धंगेकर यांचे नाव लोकसभेसाठी निश्चित झाल्याचे वारंवार सांगितले जातेय,यामुळे तर परंपरागत कॉंग्रेसचे काम करणारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते हतबल झालेत.आणि ‘या पक्षात आता जे जे होईल तेते पाहतच कुठवर बसायचे ?’ असा सवाल विचारला जात असताना मोहन जोशींनी मोरेंची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली गेली. आणि धंगेकर यांचे नाव आघाडीवर असताना लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहन जोशी यांनी मनसे तून बाहेर पडलेल्या माजी नगरसेवक मोरे यांची भेट घेतली आणि हि भेट त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी घेतली गेल्याची अफवा जोरदारपणे पसरली,आपण भेट घेतली पण यात लोकसभाच काय विधानसभेच्या उमेदवारीचा देखील काही संबध नाही,कात्रजमध्ये ते कॉंग्रेस वाढवू शकतील काय ? या विचाराने आपण मोरेंची भेट घेतल्याचा दावा मोहन जोशींनी केला तर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले त्यांनी लोकसभेचे काही बोलणे केले असेल तर ते कशाच्या आधारे केले याबाबत माहिती घ्यावी लागेल, मात्र स्थानिक अध्यक्ष म्हणून याबाबत आपल्याशी काहीही बोलणे झालेले नही अगर आपणास काहीही माहिती नाही.दरम्यान मोहन जोशी,अरविंद शिंदे,अभय छाजेड हे निष्ठावंतच आहेत आणि तेही लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेतच प्रादेशिक नेते आणि दिल्लीश्वर कुणाच्या पारड्यात ‘न्याय’ टाकतात हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अशोक लेलँडतर्फे वैशिष्ट्यपूर्ण TAURUS आणि HIPPO हे हेवी-ड्युटी ट्रक्स पुन्हा सादर

पुणे -: हिंदुजा समूहाची प्रमुख भारतीय कंपनी आणि देशातील आघाडीच्या...

ऍक्सिस बँक:ठेवींमध्ये आणि कर्जवाढीत अनुक्रमे 15% आणि 14% अशी मजबूत वार्षिक वाढ

स्थिर NII आणि सुदृढ फी उत्पन्नाच्या आधारावर कोर ऑपरेटिंग नफा तिमाही-दर-तिमाही (QoQ) 9% ने वाढला, तर निव्वळ नफा (PAT) 28% ने वाढला पुणे-: भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक...

सर्व्हायकल कॅन्सर :वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो.

सर्व्हायकल कॅन्सर जनजागृती महिना : ‘टाटा एआयए हेल्थ बडी’मुळे कुटुंबांसाठी प्रतिबंधात्मक सोपा व सहज उपाय उपलब्ध मुंबई, २८ जानेवारी २०२६ : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) अनेकदा शांतपणे वाढतो, लक्षात न येता राहतो आणि गंभीर परिणाम घडवतो. पण ही परिस्थिती बदलू शकली, तर? या आजाराचा प्रतिबंध आजच आपल्या आवाक्यात असेल, तर? सर्व्हायकल कॅन्सर : टाळता येणारे संकट सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. महिलांमधील एकूण कर्करोगांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण या आजाराचे असतात. मात्र आनंदाची बाब म्हणजे, यापैकी सुमारे ९० टक्के रुग्णांना हा आजार वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो. तरीसुद्धा, ३० ते ४९ वयोगटातील केवळ २ टक्क्यांपेक्षाही कमी महिलांनी आजपर्यंत या आजाराची तपासणी करून घेतलेली आहे (स्रोत: hpvcentre.net, cdc.gov, who.int). हे त्यांच्या उदासीनतेमुळे होत नाही, तर अनेक महिलांना योग्य माहिती, सुविधा आणि वेळेवर मदत मिळत नाही म्हणून असे होते. यावरचा उपाय सोपा आहे. प्रतिबंधासाठी आधीच एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन) ही लस घेणे, हा ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळविण्याचा प्रभावी मार्ग आहे. प्रतिबंधाची सुरुवात वेळेवर कृतीपासून होते गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याआधीच एखाद्या कुटुंबाने पावले उचलली तर काय? टाटा एआयए हेल्थ बडी कुटुंबांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण घेण्यास सक्षम करते. ‘हेल्थ बडी’च्या सुविधांमधून ‘एचपीव्ही’चे लसीकरण सहज उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांना ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळवता येते, तेही सवलतीच्या दरात. बाहेर वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स घेण्याचा त्रास आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. त्यांपासून टाटा एआयए सुटका करून देते. त्यामुळे योग्य वेळी, योग्य पाऊल उचलणे कुटुंबांसाठी सोपे होते. ‘टाटा एआयए हेल्थ बडी’चा वापर ग्राहक कंपनीच्या अ‍ॅपवर करू शकतात: अॅंड्रॉईड : गूगल प्लेवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅपआयओएस : अॅप स्टोअरवरवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅप ‘टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स’चे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि बिझनेस मिड ऑफिसमधील मार्केटिंग विभागाचे चीफ ऑफ प्रॉडक्ट्स सुजीत कोठारे म्हणाले, “सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांना भेडसावणारा खूप मोठा धोका आहे, पण त्याचा प्रतिबंध आपल्या हातात आहे. एचपीव्ही लसीकरणासारखे सक्रिय पाऊल वेळेवर उचलल्यास आपण आगामी पिढ्यांचे संरक्षण करू शकतो. महिलांना निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने देण्यासाठी आम्ही ‘टाटा एआयए’मध्ये कटिबद्ध आहोत. आमच्या टाटा एआयए हेल्थ बडी सुविधांद्वारे आम्ही एचपीव्ही लसीकरणावर खास सवलत देत आहोत. त्यातून आम्ही ज्या समुदायांची सेवा करतो त्यांच्या आरोग्यकल्याणाप्रती असलेली आमची बांधिलकी अधिक बळकट करतो. एकत्र येऊन आपण ‘सर्व्हायकल कॅन्सर’विरुद्धच्या लढ्यात दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवू शकतो.” फक्त लसीकरणापुरतीचच नव्हेस तर प्रत्येक टप्प्यावर सर्वांगीण साथ सर्व्हायकल कॅन्सरचा प्रतिबंध ही केवळ सुरुवात आहे. टाटा एआयए हेल्थ बडी हे अॅप कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्यप्रवासात साथ देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात पुढील सुविधा मिळतात: ·         डॉक्टरांशी सल्लामसलत : गरज पडेल...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भव्य रंगावलीतून अभिवादन

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन पुणे : महाराष्ट्राचे...