जालना जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी सोमवार दिनांक २६ म्हणजेच आज मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे.आंदोलकांनी आपापल्या घरी जावं, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं. आम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं नाही त्यामुळं संचारबंदी लावण्यात आली आहे. सागरची दारं उघडी आहेत, असं सांगितलं पण संचारबंदी लावण्यात आली,
जालना-मराठा आंदोलक मनोज जरांगे आंतरवालीत दाखल झाले आहेत. तिथे उपस्थित मराठा बांधवांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले असून आपण संध्याकाळी 5 वाजता निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच शांततेत धरणे आंदोलन सुरू ठेवा अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता सर्व समाज बांधवांनी घराकडे जावे आणि संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. मुंबईला निघालेल्या जरांगे यांनी सध्या नमती भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला होता. यानंतर त्यांनी परिसरातील राज्यभरातील मराठा बांधवांना मुंबईसाठी येण्याचे आवाहन केलेलं होतं. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलक जमण्याची शक्यता असल्यानं जिल्हाधिकारी यांच्या वतीने संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. मनोज जरांगे यांनी संचारबंदीचा आदेश आल्यानंतर अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी आपापल्या घरी जावं, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं. आम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं नाही त्यामुळं संचारबंदी लावण्यात आली आहे. सागरची दारं उघडी आहेत, असं सांगितलं पण संचारबंदी लावण्यात आली, असं जरांगे यांनी म्हटलं. मराठ्यांची लाट विरोधात जाऊ देऊ नका, असंही ते म्हणाले.

