पाणी ही देवाने दिलेली देणगी आहे, या अमृताची काळजी आपणच घेतली पाहिजे.– सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
पुणे , २६ फेब्रुवारी २०२४:- सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सानिध्यामध्ये , ‘अमृत प्रकल्प’ अंतर्गत ‘स्वच्छ जल , स्वच्छ मन’ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे यमुना नदीच्या छठ घाटावर उद्घाटन करण्यात आले.बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन, हा प्रकल्प भारतातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५३३ हून अधिक ठिकाणी ११ लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला.सतगुरु माताजींनी अमृत प्रकल्पाच्या निमित्ताने आपल्या आशीर्वादात सांगितले की, पाण्याचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे आणि ते अमृतासमान आहे. पाणी हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे.देवाने दिलेल्या या स्वच्छ आणि सुंदर सृष्टीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपण प्रत्येकाला आपल्या कृतीतून प्रेरित केले पाहिजे, केवळ शब्दांनी नाही. जेव्हा आपण प्रत्येक कणात असलेल्या भगवंताशी नाते जोडतो आणि त्याचा आधार घेतो, तेव्हा त्याच्या सृष्टीच्या प्रत्येक रूपावर आपण प्रेम करू लागतो.आपला प्रयत्न असा असावा की जेव्हा आपण हे जग सोडू तेव्हा या पृथ्वीला अधिक सुंदर रूपात सोडून जाऊ. संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी श्री.ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी,मुळा,मुठा,भीमा,भामा,घोडनदी,पवना,वेळू,कुकडी,मीना,कऱ्हा,आनंदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट तसेच शहरातील विविध तलाव अशा ४३ ठिकाणी एकाच वेळी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट ,कात्रज तलाव ,आळंदी-देहू येथील इंद्रायणीनदी घाट ,मोरया गोसावी येथील पवना नदी घाट,झुलेलाल घाट,खडकवासला धरण परिसर , नाझरे धरण,पाषाण तलाव इत्यादी ठिकाणे प्रमुख आहेत.त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच ठिकठिकाणचे प्रशासकीय कर्मचारी ८००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते.. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित पाहुण्यांनी मिशनचे भरभरून कौतुक केले आणि निरंकारी सतगुरु माताजींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की जलसंधारण आणि जल स्वच्छता या कल्याणकारी प्रकल्पाद्वारे मिशनने निसर्ग संवर्धनासाठी नक्कीच योगदान देऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मंदिर,घाट,कॅनाल,डॅम,नदी,तळे निरंकारी स्वयंसेवकांनी केले स्वच्छ
Date:

