मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरअत्यंत गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर निघाल्याने आंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी संताप गोंधळ अशा वातावरणात मुंबईकडे जरांगे निघाल्याचे दिसले .

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. मी पायी चालत सागर बंगल्यावर जाणार आहे. तिथे माझा एन्काऊंटर करा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. यावेळी ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी माध्यमांशी बोलतानाच माईक ठेवला आणि उठून सागर बंगल्याकडे जायला निघाले. यावेळी मराठी बांधवांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण अखेरीस ते निघाले .
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. मी पायी चालत सागर बंगल्यावर जाणार आहे. तिथे माझा एन्काऊंटर करा, असा इशारा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी सरकारला शिव्या दिल्या त्याचा त्यांना राग आहे. त्यामुळे मला फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जे जे त्यांच्याविरोधात गेले त्यांना ते संपवत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.देवेंद्र फडणवीस यांना जर माझा बळी लागत असेल तर ही बैठक संपल्यानंतर मी पायी चालत सागर बंगल्यावर येतो, तिथे माझा बळी घ्या, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझा राग येतो. ते माझं उपोषण सोडायला येणार होते, मात्र मी त्यांना येऊ दिले नाही, याचा त्यांना राग आहे. ते माझ्याविरोधात ब्राम्हणी कावा रचत आहे. पण मी त्यांचे सर्व डाव उघडे करणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
अजय बारसकर यांच्यासह अनेक लोक हे फडणवीसांनी माझ्याविरोधात सोडले आहे. यात एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते आणि अजित पवार यांचे दोन आमदार देखील सहभागी असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की मला बदनाम करण्यासाठी त्यांचे षडयंत्र चालू आहे.एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजप सोडावी लागली. एकनाथ शिंदे हे कधीही शिवसेना सोडू शकत नाही, त्यांना शिवसेना सोडावी लागली. अजित पवार कधीही राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकत नाही, त्यांना देवेंद्र फडणवीसांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागली. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल कधीही शरद पवारांना सोडू शकत नाही, त्यांना तुरुंगाची भीती दाखवण्यात आली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली.
अशोक चव्हाण कधीही काँग्रेस सोडू शकत नाही, त्यांनी फडणवीसांच्या काव्यामुळे काँग्रेस सोडली.
देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना संपवले आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात भागवत कराडांचा पर्याय उभा केला. महादेव जानकर धनगर समाजाचे नेते होत होते तर गोपीचंद पडळकरांचा पर्याय उभा केला. प्रकाश आंबेडकरांविरोधात रामदास आठवले त्यांनी भाजपमध्ये घेतले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काव्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी भाजपाला दिले.

