जलरथामार्फत जिल्ह्यातील गावात प्रचार व प्रसिद्धी

Date:

पुणे: जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जल जीवन मिशन व गाळयुक्त शिवार इत्यादी शासनाच्या विविध योजनांची जलरथामार्फत प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत असून या जलरथाला जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी जिल्हा परिषद येथे हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला.

यावेळी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब गुजर, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नितीन शहा व त्याची संपूर्ण टिम व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जलरथ जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८५ ग्रामपंचायतीमध्ये भेट देणार आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये एकूण १ हजार ८४३ गवांपैकी १ हजार ४०१ गावे स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत हागणदारी मुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आली असून मार्च २०२४ अखेर सर्व म्हणजे १ हजार ८४३ गावे हागणदारी मुक्त घोषीत करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

जिल्ह्यांतील १३ तालुक्यांतील सर्व १ हजार ८४३ गावांत जलरथामार्फत योजनांची माहिती देण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ फिरणार आहे, अशी माहिती श्री. गुजर यानी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...