पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करणे, विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी यांसह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे म.न.वि.से. अध्यक्ष तथा मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्थळ – जे.डब्ल्यू मॅरीऑट इंटिल चौक, सेनापती बापट मार्ग, चतुः कुंभी मंदिर पायथा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे प्रवक्ते व म.न.वि. से. राज्य सरचिटणीस गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मनसे नेते राजेंद्र वामस्कर, पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, म.न.वि. से. राज्य सरचिटणीस आणि प्रवक्ते मजानन काळे, म.न.वि. से. राज्य प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, राज्य सचिव आशिष सावळे-पाटील, पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे, राज्य कार्यकारिणी सचिन पवार, सारंग सराफ, अभिषेक थिटे, शैलेश विटकर, रुपेश घोलप, रवि बनसोडे आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही मराठी भाषेचा प्रसार प्रचार करण्यासाठी झाली आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करून, ते विद्यार्थी नागरिकांसाठी खुले करावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयात दर्शनी भागात पुणे विद्यापीठ गीत ठळक भाषेत लावणे गरजेचे आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपासून अशांतता असल्याने, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. अशावेळी विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी; तसेच धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पुणे विद्यापीठात सुमारे तीन हजार, तर पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील संलग्न ८०० महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणानंतर, त्यांच्या रोजगारासाठी विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे घ्यावेत. उद्योग आणि सेवा क्षेत्रातील नोकरीच्या संधी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना समजण्यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट विभाग सुरू करून, त्याला ऑनलाइन प्लेसमेंट पोर्टलवी जोड यावी. मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.
विद्यापीठात शिकणाऱ्या साधारण हजार विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी. परदेशात किंवा परराज्यात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ट्रांस्क्रिप्ट अशा कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पास्दी होण्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा संपूर्णपणे ऑनलाईन कराव्यात. अर्जाच्या हार्ड कॉपी आणून देण्याची प्रक्रिया बंद करावी.
अनेक महाविद्यालयांच्या संकेतस्थळ अद्यावत नसून, त्यावर फारच त्रोटक माहिती आहे. अशा सर्व महाविद्यालयांना सूचना देऊन, संकेतस्थळ अद्यावत करून, त्यावर महाविद्यालयाच्या संबंधित सर्व माहिती प्रकाशित करण्याच्या सूचना चाव्या, नगर आणि नाशिक उपकेंद्राचे काम पूर्ण करून, तेथे तातडीने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांला कोणतीही अडचण आल्यास किंवा त्याला शैक्षणिक कागदपत्रांची गरज भासत्यास ते तेथूनव उपलब्ध व्हावे. संबंधित विद्यार्थ्याला पुण्यात येण्याची गरज भासू नये.
राज्यात दुष्काळ सहश्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने या भागातील विद्यार्थ्यांची सीएसआस्ख्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची; तसेच एकवेळ जेवणाची सोय करण्यासाठी पावले उचलावीत, विद्यापीठाने १११ जागांसाठी प्राध्यापक भरती सुरू केली आहे. ठी भस्ती पास्टर्जी पद्धतीने पार पाडावी आणि गुणवत्ताधास्क उमेदवारांना न्याय मिळावा. या भरतीवर ठसविक व्यक्ती किंवा संघटनेचे वर्चस्व असू नये. असे झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.

