मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सकाळीच भेट घेतली. यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा सुरु झाली होती. या बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज ठाकरे यांनी उत्तर देणे टाळले. आज मी राजकीय विषयावर बोलणार नाही. जेव्हा त्या विषयी बोलायचे, तेव्हा बोलणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. एकंदरीत त्यांनी या विषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले.
मुंबई-शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावू नका, अशी मागणी या पालक आणि शिक्षकांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता या पालकांनी व्यक्त केली होती. यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. या शिक्षकांना निवडणुकीच्या कामात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. असे असेल तर निवडणूक आयोग पाच वर्ष काय करते? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक आयोगाकडे पाच वर्ष काय काम असते? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. निवडणुका तोंडावर आल्या की घाईघाईने शिक्षकांना कामाला लावायचे, असे का केले जाते? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. कोणत्याही शिक्षकाने निवडणुकीच्या कामावर रुजू होऊ नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कोण शिस्तभंगाची कारवाई करतो, ते आम्ही पाहणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे भेटण्यासाठी जाणार आहोत. ते पाच वर्ष काय काम करतात? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ही काही देशातील पहिली निवडणूक नाही, त्यामुळे सर्व नियोजन का केले जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी निवडणूक आयोगावरच कडक कारवाई करायला हवी, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लवकरच आमचे नेते निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर होणाऱ्या विशेष अधिवेशनाचा काहीही परिणाम होणार नाही. हे सर्व दिखावा केला जात आहे. हा विषय राज्याचा नाहिच. यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्याबाबत केंद्रामध्येच तोडगा निघु शकतो, त्यामुळे हे सर्व मराठा समाजाला झुरवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीच्या वेळीच त्यांना सर्व सांगितले होते. राज्य सरकारच्या माध्यमातून या बाबत काहीच होणार नसल्याचा दावा पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केला आहे.

