मेधा कुलकर्णी भाजपकडून राज्यसभेवर …

Date:

भाजप लोकसभेसाठीही धक्काच देणार ..

पुणे-राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी , भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांची देखील नाराजी दूर करत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच नांदेड येथील भाजपचे जुने कार्यकर्ते डॉ. अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.मात्र या सर्वात नारायण राणे यांचा पत्ता मात्र कट झाला आहे.

नगरसेवक ,आमदार आणि आता खासदार पदी विराजमान होणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर पहा नेमके काय म्हटले.

नितीन गडकरींनी घरी जाऊन मेधा कुलकर्णींची घेतली होती भेट

पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांना आमदारकीचे तिकीट नाकारण्यात आल्यामुळे त्या नाराज होत्या. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या बातम्या वारंवार समोर आल्या आहेत.मध्यंतरी मेधा कुलकर्णी यांचे पक्षांतर्गत डावलले जाण्याची भावना जास्त बळावली तेव्हा स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती ., मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन लवकरच होईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यानुसार त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने कोथरूडमध्ये काय काय दिले 1) राज्यसभा 2)शिक्षण मंत्री 3)पालकमंत्री 4) महापौर 5)स्थायी अध्यक्ष 6)भाजप प्रदेश अध्यक्ष. एवढे दिले असताना आता कोथरूडमध्येच लोकसभेची उमेदवारी ही देईल ?

दरम्यान भाजपच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची गणिते बिघडली आहेत.अनेक इच्छुकांनी गेल्या काही महिन्यापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या नावाचा समावेश आहे.राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांचे नाव जाहीर केल्याने भाजपकडून ब्राह्मण समाजावर अन्याय होतो, अशी टीका आता कोणालाही करता येणार नाही. कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपने ब्राह्मण समाजाला डावलल्याची टीका केली जात होती.

मात्र, कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले सुनील देवधर यांचे समीकरण बिघडले आहे. राज्यसभेसाठी ब्राह्मण उमेदवार पुढे केल्याने लोकसभेसाठी आता ब्राह्मण उमेदवार दिला जाईल असे वाट्त नाही.

प्रा. मेधा कुलकर्णी या कोथरूडमधील आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी त्याच भागातील उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांचे उमेदवारीचे ‘ चान्सेस ‘ कमी झाले आहेत. तर दुसरे इच्छूक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची संधी वाढली आहे.मात्र त्यांचा कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघात किती प्रभाव आहे याचा अहवालाने त्यांची गोची होऊ शकणार आहे. त्यामुळे मुळीक यांनाही वगळून लोकसभेसाठी कोणाला अपेक्षीत नसणारे आणि पुणे महापालिकेतील सत्ता खेचून आणणारे वेगळे नाव भाजपने घोषित केले तर फारसे आश्चर्य वाटायला नको. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे मुळीक हे माजी आमदार आहेत.. दुसरे असे की, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी देऊन कोथरूडचे विद्यमान आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आपला मतदारसंघ ‘ सेफ ‘ करून ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे.आता देखील मेधा कुलकर्णी यांचे नाव कुठेही चर्चेत नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नाव भाजप श्रेष्ठींकडून अंतिम करण्यात आले. त्यांचे नाव समोर आल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेतील जे इच्छुक आहेत त्यांना डावलून इतर काही नावे देखील पक्षाकडून पुढे येऊ शकतात, असा सूचक इशारा भाजपने यानिमित्ताने दिला असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत मेधा कुलकर्णी ?
प्रा. मेधा कुलकर्णी या 3 वेळा नगरसेवक होत्या. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्या कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापून तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे कुलकर्णी काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सुरुवातीच्या काळात सुरू झाली होती.

विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिला मोर्चाच्या केंद्रीय समितीवर केली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे जिल्ह्यातील १७ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.