महाराष्ट्र कारागृह विभाग राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न

Date:

पुणे- महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांचेकरीता राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र कारागृह विभागाचे एकुण पाच विभाग असुन विभागीय स्तरावरुन विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या खेळाडुंनी उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे अथवा जे खेळाडु विजेते आहेत अशा खेळाडुंकरीता दरवर्षी मुख्यालय स्तरावरुन वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालय, येरवडा, पुणे येथे करण्यात येते. सन 2023-2024 च्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन दिनांक 12.02.2024 रोजीअपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांचे हस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) तथा राज्यस्तरीय क्रीडा समितीच्या अध्यक्षा श्रीमती स्वाती साठे तसेच श्रीमती जुगनु गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी अमिताभ गुप्ता व स्वाती साठे यांनी उपस्थित सर्व खेळाडुंना मार्गदर्शन केले. उदघाटन सोहळया प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरुष व महिला खेळाडुंच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
दिनांक 12.02.2024 ते 16.02.2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभाग, मुंबई विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नाशिक विभाग व नागपूर विभागातील जवळपास 220 खेळाडुंनी सहभाग घेतलेला असुन या स्पर्धांमध्ये पुरुष व महिला खेळाडुंसाठी 100 मी धावणे, 200 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, रिले, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, कराटे, कुस्ती, बॅडमिंटन एकेरी, रिंगटेनीस एकेरी हे वौयक्तिक खेळ तसेच कबडडी, व्हॉलीबॉल, रस्साखेच या सांघिक खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) श्री अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतुन सन 2024 या वर्षापासुन क्रिकेट या खेळाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्व खेळाडुंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
शारीरीक व मानसिक स्वास्थ निरोगी राहण्याकरीता खेळाला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. खेळामुळे संघभावना वाढीस लागुन खेळाडुमध्ये शिस्त आणि कामाचा उत्साह वाढीस लागतो. त्याचबरोबर शारीरीक व मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन होऊन एकाग्रता सुधारण्यास मदत होते. निरोगी खेळाडु हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज, निरोगी देश घडवतो, याच प्रमुख उददेशाने कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांच्यामध्ये असलेल्या क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा, त्यांच्या मध्ये संघभावना वाढीस लागावी व दैनंदिन कामकाजाच्या ताणतणावातुन विरंगुळा मिळावा याकरीता विभागीय व राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
सदरच्या उदघाटन सोहळयाकरीता कारागृह उपमहानिरीक्षक (मुंबई विभाग) योगेश देसाई, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालयाचे प्राचार्य नितीन वायचळ , येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षकसुनील ढमाळ, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षकवौभव आगे, येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर तसेच इतर कारागृहांचे अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच खेळाडु उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.