रा.स्व. संघात व्यक्तीला नाही तर विचारांना महत्त्व

Date:

सकल हिंदू समाज मानाजी नगर आयोजित विराट हिंदू संमेलन
पुणे : भीती वाटावे असे वातावरण देशात असताना २०१४ साली स्वातंत्र्याची कल्पना देशात आली. हिंदूंची दैन्यवस्था करण्याचे काम हिंदूंनीच केले आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू समाजाचे संघटन करण्याचे ठरवले.घराणे शाही मोडून काढण्याचे काम संघाने केले आहे. कर्तृत्ववान कार्यकर्ते संघात निर्माण झाले आणि ते संघाने समाजासाठी दिले. फक्त देशभक्त या देशाचे प्रश्न सोडवू शकतील आणि देशभक्त फक्त संघातच घडू शकतो. संघात व्यक्तीला नाही तर विचारांना महत्त्व आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य हेमंत हरहरे यांनी व्यक्त केले.

सकल हिंदू समाज मानाजी नगर नऱ्हे परिसर तर्फे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन प्रा. डॉ. सुधाकर राव जाधवर कॅम्पस येथे करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. राजेंद्र येप्रे महाराज,  सेवा भारती वैभव श्री आयाम प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या रेखाताई सोनुने, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात भारुड सादरीकरण करण्यात आले.

राजेंद्र येप्रे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायचा असेल तर संस्थापक हेडगेवार यांना समजून घेणे गरजेचे आहे. या संमेलनाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा हिंदूंना संघटित करणे आहे. हिंदूंना संघटित करणे म्हणजे वाळूतून तेल काढण्यासारखे आहे. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी ज्ञान विज्ञान आणि शांती आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्ध थांबले,इराण-अमेरिका 2 आठवड्यांसाठी युद्धविराम

इराण आणि अमेरिका 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत....

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या...

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ...

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी...