नागपूर-मुंबई महामार्गावर जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सफाईचे काम उरकून मजूर पिकअप वाहनात बसत असताना या वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की यात मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर कडवंची गावाच्या हद्दीत साफसफाईचे काम सुरू होते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मजूर काम संपून पिकपमध्ये बसून आपल्या घराकडे जात असताना ट्रकने त्यांना धडक दिली. अपघात झाला तेव्हा मजूर पिकपमध्ये बसतच होते. ठार झालेले सर्वजण बदलापूर तालुक्यातील खादगाव आणि केळीगव्हाण या गावातील आहेत.
जालन्यातील कडवंचीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या महिंद्रा पिकपला ट्रकची जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची महिती समोर आली आहे. या अपघातात सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून चालकासह ८ ते ९ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव परिसरातील 15 कामगार एबी इंटरप्राईजेस या कंपनीकडून समृद्धी महामार्गावरील स्वच्छता करण्यासाठी रोज जातात. महिला कामगारांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. या परिसरातील 15 महिला कामगार महिंद्रा पिकअपमध्ये बसून जात असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने महिंद्रा पिकअपला धडक दिली. यात 7 महिला कामगारांचा जागेवर मृत्यू झाला आहे. 8 ते 10 महिला कामगार आणि चालक गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता असून अपघातातील मृत्यू झालेले कामगार बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह जालना पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जालन्यातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

