शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

Date:

मुंबई: विधान भवन येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नद्यांमध्ये वाढलेल्या जलपर्णी तसेच दूषित पाण्याचा गंभीर प्रश्न आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून सभागृहात मांडण्यात आला.

नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळला जात असून जनावरांसाठी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नाही. तसेच, पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शुद्धीकरण न करता सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे शेतीवर गंभीर परिणाम होत असल्याचे पठारे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, “दूषित पाण्यामुळे जमिनींची सुपीकता कमी होत असून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत शुद्ध पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करू नये, ती माफ करण्यात यावी.”

यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक वर्षांपासून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून अशुद्ध सांडपाणी नदीत सोडले जात असल्याची वस्तुस्थिती मान्य केली. शेतकऱ्यांना दूषित पाणी मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शासनाकडून शेतकऱ्यांची पाणीपट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, तसेच संबंधित महानगरपालिकांकडून दंड वसूल करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वय फक्त आकडा ठरला; ५ ते ७० वयोगटातील महिलांकडून सिंहगड २.५ तासांत सर

पुणे: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सखी प्रेरणा मंच व...

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध...

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर

पुणे-स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब...